AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून मोठे बदल, 2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ

आयआरडीएआयने नवी वैयक्तिक अपघात विमा योजना 1 एप्रिलपासून लागू करण्याचे आदेश दिले. ( Accident Insurance Product)

अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून मोठे बदल, 2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 10, 2020 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली: विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने(आयआरडीएआय) नवी वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षातील 1 एप्रिलपासून नवी योजना लागू होणार आहेत. आयआरडीएआयने देशातील  सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांना एक वैयक्तिक अपघात विमा योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेतील नियम, अटी आणि फायदे सर्व कंपन्या आणि ग्राहकांसाठी सारखेच असणार आहेत. प्रस्तावित योजनेनुसार अपघात विम्याचा लाभ  2.5 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असेल. आयआरडीएआयचा स्टँडर्ड अपघात विमा योजना तयार करण्यामागे अपघात विम्यावरील लोकांचा विश्वास वाढवणे हा उद्देश आहे. (IRDAI proposes standard personal accident product)

अपघात विम्याची वैशिष्ट्ये

विमाधारक व्यक्तीला मृत्यू, कायमचे अपंगत्व, आंशिक अपंगत्व आल्यास या अपघात विमा योजनेद्वारे लाभ मिळणार आहे. नव्या अपघात विमा योजनेद्वारे विमा घेतलेल्या व्यक्तीला रुगणालयात दाखल होण्याचा खर्च दिला जाणार आहे. विमाधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलांच्या शिक्षणाचाही खर्च केला जाणार आहे. (IRDAI proposes standard personal accident product)

आयआरडीएआयने प्रस्तावित अपघात विमा योजनेवर 18 डिसेंबरपर्यंत सूचना आणि सुधारणांसाठी वेळ दिला आहे. या काळात आयआरडीएकडे याबाबत सूचना नोंदवाव्या लागणार आहेत. 2021 च्या एप्रिल महिन्यापासून आयआरडीएआयने स्टँडर्ड अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

नव्या योजनेच्या मसुद्यामध्ये बाजारात वेगवेगळ्या अपघात विमा योजना उपलब्ध असून त्यामुळे ग्राहकांना निवड करताना अडचण निर्माण होते, असं म्हटलं आहे. प्रत्येक कंपन्यांच्या अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये वेगळी असल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होतो. त्यामुळे आयआरडीएआयने सामान्य ग्राहकांसाठी स्टँडर्ड अपघात विमा योजना सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्तावित योजनेनुसार अपघात विम्यातील कमीत कमी संरक्षण 2.5 लाख तर जास्तीतल संरक्षण 1 कोटी पर्यंत असेल. (IRDAI proposes standard personal accident product)

संबंधित बातम्या:

RTGS सुविधेत ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या ग्राहकांना कसा मिळणार फायदा?

मोदी सरकारची अल्प उत्पन्न गटाला खुशखबर, खात्यात अधिक पगार जमा होणार

19 कोटी नागरिकांसाठी मोठं गिफ्ट, आता या खात्यामध्ये सरकार जमा करणार एकमुखी रक्कम

(IRDAI proposes standard personal accident product)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक