AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ‘एनपीएस’ ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये करण्यात येणारी गुंतवणूक निवृत्तीच्या दृष्टीकोणातून सर्वोत्तम मानण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेऊन जर आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत प्रदीर्घ काळासाठी गुंतवणुक केल्यास, निवृत्तीनंतर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी 'एनपीएस' ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 7:20 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये करण्यात येणारी गुंतवणूक निवृत्तीच्या दृष्टीकोणातून सर्वोत्तम मानण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेऊन जर आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत प्रदीर्घ काळासाठी गुंतवणुक केल्यास, निवृत्तीनंतर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. निवृत्तीनंतर एक मोठी रक्कम आपल्या हातात असल्याने आपण निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगू शकतो. राष्ट्रीय पेन्श योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी  ही योजना नेमकी काय आहे? त्याचा फायदा कसा होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

    कोणाला करता येते गुंतवणूक?

केंद्र सरकारकडून 2004 साली ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादीत असलेली ही योजना, 2009 साली सर्वांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमध्ये तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षानंतर कधीही गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. दर महिन्याला एक ठरावीक रक्कम या योजनेमध्ये गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.

लवकर  गुंतवणुकीला सुरुवात करणे फायद्याचे 

या योजनेमध्ये तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराय तेवढा पुढे तुमचा फायदा होतो. समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी दर महिन्याला या योजनेत 1 हजार रुपये गुंतवण्यास सुरुवात केली, तर तो त्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत केवळ 3 लाख रुपयेच जमा करू शेकेल. या  3 लाखांच्या मोबदल्यामध्ये त्याला एकूण 13.37 लाखांचा फायदा होतो. यापैकी आठ लाख रुपये हे त्याला एकरकमी मिळतात, तर पुढे कायमस्वरूपी 2676 रुपये पेन्शन सुरू होते. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो.

संबंधित बातम्या 

ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण; अ‍ॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ‘या’ तारखांना असणार सुटी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.