AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JOBS: गडयांनो आता लागा तयारीला, देशातील लाखो मजुरांच्या हाताला मनरेगाचा आधार; 24.4 दशलक्ष लोकांना मिळेल काम! मात्र सरकारची चिंता वाढली

मनरेगा संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार या योजनेंतर्गत कुटुंबांना गेल्या वर्षीपेक्षा अधिक काम मिळाले आहे. मे महिन्यांत गेल्यावर्षीपेक्षा 9.9 टक्के अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने 24.4 दशलक्ष लोकांना काम दिले, 2021 मध्ये 22.2 दशलक्ष लोकांच्या हाताला काम मिळाले होते. मात्र यंदा एप्रिलमध्ये 18.6 दशलक्ष लोकांनाच रोजगार मिळाला होता.

JOBS: गडयांनो आता लागा तयारीला, देशातील लाखो मजुरांच्या हाताला मनरेगाचा आधार; 24.4 दशलक्ष लोकांना मिळेल काम! मात्र सरकारची चिंता वाढली
मनरेगा रोजगारात वाढImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 3:17 PM
Share

देशातील मजुरांच्या चेह-यावरील स्मीत पुन्हा खुलले आहे. त्यांच्या हाताला सरकारने मनरेगा योजनेतंर्गत (MGNREGA Scheme) काम दिले. एप्रिल महिन्याचा कटु अनुभव त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला नाही. एप्रिल महिन्यात मनरेगा अंतर्गत रोजगारात घट झाली होती. 18.6 दशलक्ष लोकांच्या हाताला काम मिळाले होते. गेल्या वर्षी मे महिन्यातील जॉब कार्डपेक्षा (Job Card) हा आकडा कमालीचा कमी होता. 2021 मधील मे महिन्यात 22.2 दशलक्ष लोकांच्या हाताला काम मिळाले होते. त्यानंतर मे महिन्यात या आकडयात कमालीची वाढ झाली. 2021 मध्ये कोविडच्या दुस-या लाटेनंतर (Covid Second Wave) कामाची मागणी वाढली होती आणि मजुरांच्या (Labour) हाताला काम ही मिळले होते. परंतू आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना मनरेगाच्या कामावर मजुरांची रोजंदारीसाठीची ही लक्षणीय वाढ अनाकलनीय आहे. यावरुन सरकारच्या अर्थस्तरावरील सुधारणांना धक्का बसला आहे.

सरकारची डोकेदुखी वाढणार?

एकीकडे मजुराच्या हातांना काम मिळाले असले तरी दुसरीकडे सरकारच्या सुधारणावादी भूमिकेला हा धक्का मानण्यात येत आहे. सरकार प्रमुख ग्रामीण रोजगार योजनेतंर्गत कामाच्या मागणीत कमालीची घट अपेक्षित धरत होते. एप्रिल महिन्याने सरकारला तसा कौलही दिला होता. सरकार व्यतिरिक्त इतर ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे हे द्योतक होते. परंतू, मे महिन्यातील ही आकडेवारी सरकारची डोकेदुखी वाढवणारी आहे. आर्थिक मापदंडांवर सरकार खरे उतरले का? हे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सरकारने मनरेगातंर्गत घरगुती कामासाठी 2022-23 या कालावधीसाठी 73,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुदीतून 2.276 अब्ज राखीव ठेवण्यात आले आहे.

काय बाजारात रोजगार उपलब्ध नाहीत?

मनरेगा संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार या योजनेंतर्गत कुटुंबांना गेल्या वर्षीपेक्षा अधिक काम मिळाले आहे. मे महिन्यांत गेल्यावर्षीपेक्षा 9.9 टक्के अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने 24.4 दशलक्ष लोकांना काम दिले,यंदा एप्रिलमध्ये 18.6 दशलक्ष लोकांनाच रोजगार मिळाला होता. एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे मनरेगाकडे मजुरांचा ओढा वाढला आहे. एप्रिल महिन्यात मनरेगाच्या जॉबवर काम करणा-यांची संख्या कमालीची घटली होती. मात्र मे महिन्यातील आकडयांनी सरकारच्या तोंडचे पाणी पळवले आहे. यामुळे आर्थिक सुधारणांच्या नितीला धक्का बसला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, बाजारात मजुरांच्या हाताला काम मिळालेले नाही, बाजार अद्यापही स्थिरावलेला नाही. आता लोकांच्या पोटाला रोजगार द्यायचा असल्याने आणि वाढत्या रोजगाराच्या मागणीमुले सरकारला गेल्या दोन वर्षात मनरेगा योजनेच्या निधी वाटपाचा अंदाज बदलावा लागला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.