AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सार्वजनिक उद्योग विभागाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या आता नेमके काय होणार

लोकसभेच्या तिसऱ्या अंदाज समितीच्या शिफारशींवर, केंद्रीकृत समन्वय युनिट तयार करण्याची चर्चा झाली. हे युनिट सरकारी मालमत्तांचे मूल्यांकन करेल. (Modi government's big decision regarding public industry department; know exactly what will happen now)

सार्वजनिक उद्योग विभागाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या आता नेमके काय होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 07, 2021 | 3:36 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारने सार्वजनिक उद्योग विभाग आता अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आणला गेला आहे. हा विभाग यापूर्वी अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करीत होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना या मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. परंतु, सार्वजनिक उपक्रम विभाग वित्त मंत्रालयात वर्ग केला असून, या मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण आहेत. तसेच अनुराग ठाकूर हे या विभागाचे राज्यमंत्री आहेत. (Modi government’s big decision regarding public industry department; know exactly what will happen now)

सार्वजनिक उपक्रम विभागाबद्दल जाणून घ्या

लोकसभेच्या तिसऱ्या अंदाज समितीच्या शिफारशींवर, केंद्रीकृत समन्वय युनिट तयार करण्याची चर्चा झाली. हे युनिट सरकारी मालमत्तांचे मूल्यांकन करेल. याच अनुषंगाने 1965 साली सार्वजनिक मंत्रालयात ब्युरो ऑफ पब्लिक एंटरप्रायजेसची (बीपीई) स्थापना झाली. त्यानंतर सप्टेंबर, 1985 मध्ये केंद्र सरकारच्या मंत्रालये / विभागांच्या पुनर्रचनेनंतर ‘बीपीई’ला उद्योग मंत्रालयाचा एक भाग बनविण्यात आले. मे 1990 मध्ये बीपीई स्वतंत्र विकसित विभाग करण्यात आला. याच विभागाला आता ‘सार्वजनिक उपक्रम विभाग’ (डीपीई) असे नाव देण्यात आले आहे. सध्या हा विभाग केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाचा एक भाग आहे.

आता काय होईल

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयांतर्गत आता 6 मंत्रालये कार्यान्वित आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सार्वजनिक उद्योग विभाग अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्याच्या सरकारच्या नव्या धोरणानुसार सरकार आपला निर्गुंतवणूक म्हणजेच खाजगीकरणाचा उपक्रम अधिक वेगवानपणे पुढे नेण्यास सक्षम होईल. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्या आणि वित्तीय संस्थांमधील भागभांडवल विक्री करून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि विमा कंपनीच्या निर्गुंतवणुकीचा समावेश आहे.

मंत्रालयाचे काम काय आहे?

निर्गुंतवणुकीचे काम फक्त सार्वजनिक उपक्रम विभागाकडे आहे. सरकारी कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, उत्तम कामगिरीसाठी तसेच कंपनीचे पुनर्गठन तसेच कंपनी बंद करण्यासाठी शिफारस करणे हे अर्थ मंत्रालयाचे काम आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामधील (पीएसयू) शासकीय भागभांडवलाची विक्री करण्याच्या प्रक्रियेस निर्गुंतवणूक असे म्हणतात. अनेक कंपन्यांमध्ये सरकारची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे. सर्वसाधारणपणे या कंपन्यांना सार्वजनिक उपक्रम किंवा PSU असे म्हणतात. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) आपला हिस्सा कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी निर्णय घेत असते. बर्‍याचदा सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकार आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट ठरवते. सरकार निधी उभारणीसाठी सरकारी कंपन्यांची खाजगीकरणाचा निर्णय घेते. (Modi government’s big decision regarding public industry department; know exactly what will happen now)

इतर बातम्या

पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार?; वाचा, संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’.

CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’

त्यांचा आवाज स्पष्ट, निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे..; रितेश देशमुख- जिनिलियाचा आंदोलकांना पाठिंबा.

त्यांचा आवाज स्पष्ट, निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे..; रितेश देशमुख- जिनिलियाचा आंदोलकांना पाठिंबा

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका.

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट