AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठाई सणाचा गोडवा कमी करणार; सर्वसामान्यांना बसणार मोठी आर्थिक झळ

येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत दुधापासून तयार होणारी मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. एकीकडे जनावरांना (Cattle) होत असलेल्या आजारामुळे दूध उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे चारा महाग (inflation) होत असल्यानं दूध (milk) स्वस्त होण्याऐवजी महागच होण्याची शक्यता आहे.

मिठाई सणाचा गोडवा कमी करणार; सर्वसामान्यांना बसणार मोठी आर्थिक झळ
| Updated on: Sep 10, 2022 | 3:51 PM
Share

मुंबई : येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत दुधापासून तयार होणारी मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. एकीकडे जनावरांना (Cattle) होत असलेल्या आजारामुळे दूध उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे चारा महाग (inflation) होत असल्यानं दूध (milk) स्वस्त होण्याऐवजी महागच होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमधील दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झालाय.आणि त्याच कारणामुळे दूध उत्पादनाला फटका बसलाय.गुजरात आणि राजस्थाननंतर आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही लम्पी स्किनचा फैलाव होतोय. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन राज्य दूध उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र लम्पी स्किन आजारामुळे या राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झालाय.

लंपी क्रिनचा वेगाने फैलाव

एकट्या राजस्थानमध्ये दहा हजारांहून अधिक जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. गुजरातमध्ये पाच हजार जनावरांचा मृत्यू झालाय.दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झाल्यानंतर दुधात 60 टक्के घट होते.लंपी स्किन आजारातून बरे झालेल्या जनावरांचं दूध उत्पादन त्याच स्तरावर येण्यासाठी वेळ लागतो.याच कारणांमुळे दूध उत्पादन प्रभावित होत आहे.दुध उत्पादन कमी झाल्यामुळे डेअरीच्या दूध संकलनातही घट झाली आहे.

अनेक ठिकाणी दूध संकलनात चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानं दूध संकलन घटलंय.गेल्या वर्षी कोरोनामुळे संघटित क्षेत्रातील डेअरींकडेच दूधाचा पुरवठा होत होता. यंदा परिस्थिती सामान्य झाल्यानं असंघटित क्षेत्राकडेही दुधाचा पुरवठा वाढू लागला आहे.

चाऱ्याचे दर वाढले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याचे दरही 15 ते 17 टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच दुध उत्पादकांच्या पशुखाद्याच्या दरात वाढ होणार आहे. मात्र दुसरीकडे दुधाच्या दरात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दूध उत्पादनाचा खर्च आणि बाजारातील मागणीची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत दुधाच्या दरात जरी वाढ झाली नाही, तरी किंमती कमी होण्याची शक्यता बिलकूल नाही अशी माहिती अमूल डेअरीचे एमडी आर.एस. लोढी यांनी दिली आहे.

मिठाई महागणार

दुध उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळेच गेल्या महिन्यात दुध कंपन्यांनी दुधाच्या किंमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. आता लंपी स्किन आजारामुळे दुध उत्पादन घटल्यानं पुन्हा एकदा दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. दूध हा मिठाईतील प्रमुख घटक असल्यानं येत्या काळात मिठाईचे दर देखील वाढणार आहेत.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.