AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. अखेर युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (crude oil price) झपाट्याने वाढल्या आहेत.

Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने
| Updated on: Feb 25, 2022 | 8:05 AM
Share

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. अखेर युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (crude oil price) झपाट्याने वाढल्या आहेत. कच्चा तेलाच्या किमती 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. कच्चे तेल महागल्याने भारतात देखील इंधनाचा भडका उडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र याबाबत बोलताना एका उच्चस्थरीय सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम हा भारतावरील इंधन पुरवठ्यावर supply) होणार नाही. इंधनाचा तुटवडा जाणू नये याकडे सरकारचे पूर्ण लक्ष आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय स्थरावर सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देशातील प्रमुख इंधन पुरवठा कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये (petrol and diesel price) कोणतीही वाढ केलेली नाही. देशात गेल्या 114 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

…म्हणून परिणाम होणार नाही

या बाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये कितीही दिवस युद्ध चालले तरी त्याचा परिणाम हा भारताच्या इंधन पुरवठ्यावर होणार नाही. कारण भरताला इंधनाचा पुरवठा हा पश्चिम अशिया, अफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमधून होतो. या भागावर हल्ले होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भराताच इंधनपुरवठा सुरळीत सुरू राहील. युद्धामुळे देशात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणावणार नाही. मात्र सध्या महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

2014 नंतर कच्च्या तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 103.78 डॉलरवर पोहोचले आहेत. 2014 नंतरची ही सर्वाधिक भाववाढ आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक झाल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine crisis : भारताला गव्हाची निर्यात वाढवण्याची संधी; देशात पुरेशा प्रमाणात साठा

सरकारी कर्मचाऱ्यांना का नकोय ‘एनपीएस’? जाणून घ्या जुन्या पेन्शन योजनेचे फायदे

काय आहे फंड ऑफ फंड्सचा फंडा?; गुंतवणूक कशी कराल?

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.