AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची मोठी घोषणा, सरकारी शाळेत दुपारचं जेवण मोफत, कोट्यवधी मुलांना फायदा होणार

सरकारच्या मते, देशातील 11 लाख 20 हजार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी 1 लाख 71 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

मोदी सरकारची मोठी घोषणा, सरकारी शाळेत दुपारचं जेवण मोफत, कोट्यवधी मुलांना फायदा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Sep 29, 2021 | 5:00 PM
Share

नवी दिल्लीः केंद्र सरकार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत देशातील कोट्यवधी मुलांना 5 वर्षे मोफत अन्न दिले जाणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या योजनेची माहिती दिली.

ही योजना शिक्षण विभागाशी संबंधित आहे आणि या देशातील गरीब कुटुंबातून आलेल्या करोडो मुलांना पोषण योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी सरकारने अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही घेतलाय. सरकारी शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांसाठी ही योजना सुरू केली जाईल. त्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे ठेवण्यात आले. शासकीय शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच या योजनेचा लाभ शासकीय अनुदानित शाळांमध्येही दिला जाईल.

नवीन योजनेत काय?

सरकारच्या मते, देशातील 11 लाख 20 हजार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी 1 लाख 71 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. देशातील करोडो मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (पीएम पॉशन शक्ती निर्माण योजना) सुरू केली जात आहे.

ही नवीन योजना सुरू केली जातेय

केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकार मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण देखील सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि हे लक्षात घेऊन ही नवीन योजना सुरू केली जात आहे. यामुळे शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल आणि त्यांचे शिक्षण आणि पोषण विकसित होईल. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणातील ‘सामाजिक आणि लिंगभेद’ दूर करण्यास मदत होईल.

महत्त्वाचे निर्णय नेमके काय होते

पत्रकार परिषदेत आणखी अनेक योजनांची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने नीमच-रतलाम ट्रॅक दुहेरी करण्याचा निर्णय घेतलाय. या कामासाठी 1096 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. याशिवाय राजकोट-कनालुस लाईन दुप्पट करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 1080 कोटी खर्च येणार आहे.

स्वावलंबी भारताच्या योजनेला वेग

पत्रकारांना योजनांची माहिती देताना वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, मोदी सरकार निर्यातीला चालना देण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. उद्योग क्षेत्रात उत्पादन करण्याबाबत अनेक निर्णय घेण्यात आलेत. 1 वर्षात स्वावलंबी भारताअंतर्गत निर्यातीवर भर देण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षात 21 सप्टेंबरपर्यंत देशाने 185 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, जो सहा महिन्यांचा विक्रम आहे.

संबंधित बातम्या

Gold Price Today: सोने महागले, तर चांदी झाली स्वस्त, पटापट तपासा नवे दर

पेटीएमने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता तुम्ही डिजिटल वॉलेटमध्ये थेट परदेशातून मागवू शकाल पैसे

The government will launch a plan to create nutritional power, free food for millions of children up to 5 years

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.