AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vodafone Idea भारतातून गाशा गुंडाळणार ? काय आहे कारण?

व्होडाफोन आयडिया कंपनीने अखेर हार मानली आहे. जर आपल्याला बँक फंड मिळाला नाही तर येत्या आर्थिक वर्षात कंपनी आपले देणी चुकती करु शकणार नाही हे स्पष्ट केले आहे.

Vodafone Idea भारतातून गाशा गुंडाळणार ? काय आहे कारण?
| Updated on: May 16, 2025 | 3:15 PM
Share

व्होडाफोन आयडिया गुंतवणूकदारांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. व्होडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.जर आपल्याला बँक निधी मिळाला नाही तर कंपनीला चालू आर्थिक वर्षानंतर काम सुरू ठेवणे शक्य होणार नाहीत असे या याचिकेत स्पष्ट केले आहे. कंपनीचा समायोजित एकूण महसूल (AGR) लक्षात घेता बँका नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा व्होडाफोन आयडिया कंपनीने याचिकेत केला आहे.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड केंद्र सरकारला देणे लागते. या कंपनीने या देण्यावर सवलत मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल केली आहे. कंपनीने या आठवड्यात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत बँक फंडींगशिवाय कंपनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये व्यवसाय करु शकणार नाही. कारण तिच्याकडे मार्च २०२६ मध्ये दूरसंचार विभागाला १८,००० कोटी रुपयांचा एजीआर हप्ता भरण्यास निधी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

व्होडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयात ८३,४०० कोटी रुपयांच्या प्रलंबित एजीआर थकबाकीवरील व्याज, दंड आणि दंडावरील व्याज माफ करण्याची मागणी केली आहे. जी एकूण मिळून ४५,००० कोटींहून अधिक आहे. या प्रलंबित देण्यासंदर्भात सरकारने कंपनीला चार वर्षांचा मोरटोरियम दिले होते. जो येत्या सप्टेंबरमध्ये समाप्त होत आहे. कंपनीने सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारद्वारा स्पेक्ट्रम देण्यांना इक्वीटीत बदलल्यानंतर कंपनीने पुन्हा लोनसाठी बँकांशी संपर्क केला आहे. परंतू एजीआरच्या हप्त्यांना भरपर्यंत नवीन लोन देण्यास नकार दिला आहे.

देशातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया रिलायन्स जिओच्या आगमनानंतर अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने कंपनीला दिलासा देण्यासाठी तिची काही देणी इक्विटीमध्ये बदलून घेतले. त्यामुळे या कंपनीत सरकारची हिस्सेदारी ४९ टक्के झाली आहे. व्होडाफोन आयडियावर सरकारचा स्पेक्ट्रम देणी सुमारे १.१९ लाख कोटी रुपये आहे.तर ८३,४०० कोटी रुपयांचा एजीआर देणी शिल्लक आहेत. या मुळे कंपनीची एकूण देणी २ लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहेत.

एकच दिलासा…

कंपनीच्या दृष्टीने दिलासा दायक एकच बाब घडली आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्ट एजीआर देण्यासंदर्भात दिलासा मिळावा अशा पुनर्विचार याचिकेवर सुनावणीसाठी तयार झाली आहे.याच कारणांमुळे शुक्रवारी व्होडाफोन आयडियाचे शेअर ३.४६ टक्के वाढून ७.४८ रुपयांवर ट्रेड करीत आहेत.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.