AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G : पुढच्या मार्चपर्यंत इतक्या शहरात 5G चा झंझावात, या शर्यतीत सरकारची ही कंपनीही मागे नाही

5G : पुढच्या मार्च महिन्यापर्यंत देशातील या शहरात 5G चा झंझावात येणार आहे..

5G : पुढच्या मार्चपर्यंत इतक्या शहरात 5G चा झंझावात, या शर्यतीत सरकारची ही कंपनीही मागे नाही
5G ची सेवा इतक्या शहरातImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 02, 2022 | 5:17 PM
Share

नवी दिल्ली : देशात पुढच्या मार्च महिन्यात 5G चा झंझावात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 5G सेवेचे उद्धघाटन केले. दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (India Mobile Congress-IMC2022 ) आयोजन करण्यात आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्या शहरात ही सुविधा कधी येणार ते..

दरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom minister Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले की, मार्च 2023 पर्यंत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G ची सेवा मिळेल. तर 15 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत बीएसएनएल (BSNL) ही मैदानात उतरणार आहे. बीएसएनएलची 5G सेवा सुरु होईल.

दूरसंचार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन वर्षांत म्हणजे 2024 पर्यंत देशातील 80 ते 90 टक्के भागात 5G सेवा सुरु झालेली असेल. सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited-BSNL) देशात 5G सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे हे जाळे मजबूत होईल आणि सर्वदूर 5G सेवा सुरु होईल.

रिलायन्स जिओने देशात स्वस्त दरात 5G सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्वस्तात 5G सेवा देण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत आता कोणती कंपनी सर्वात स्वस्त प्लॅन देणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

रिलायन्स जिओ या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई यासारख्या चार प्रमुख शहरात 5G सेवा सुरु करणार आहे. तर एअरटेल ने या सेवेची चाचणी अगोदरच सुरु केली आहे. देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये सेवा देण्याची घोषणा कंपनीने अगोदरच केली आहे. तर व्होडाफोन-आयडियाने 5G सेवेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सेवा सुरु करण्याची आणि शहरांची नावेही सांगून टाकली आहेत. परंतु, या कंपन्यांनी 5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती दिलेली नाही. 5G प्लॅनचा दर काय असेल याची माहिती दिलेली नाही.

Follow Us
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!