AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा अजून स्वस्त होणार? सरकार करणार 5 लाख टन खरेदी

Onion Rate : कांद्याच्या वाढत्या किंमतींना लवकरच लगाम लागू शकतो. केंद्र सरकारने पुढील आदेशापर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सरकार शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचा भाव घसरण्याची दाट शक्यता आहे.

कांदा अजून स्वस्त होणार? सरकार करणार 5 लाख टन खरेदी
कांदा निर्यातबंदी उठवली
| Updated on: Mar 27, 2024 | 4:56 PM
Share

उन्हासोबत महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा आदेश अनिश्चित काळासाठी वाढवला आहे. निर्यातबंदीचा आदेश पूर्वी 31 मार्च रोजीपर्यंत होता. सरकार कांद्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी लाखो टन कांद्याची खरेदी करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आशा आहे की, कांद्याच्या किंमती कमी होतील. बफर स्टॉकसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून 5 लाख टनांहून अधिकचा कांदा खरेदी करणार आहे. सरकारने नाफेड (NAFED) आणि NCCF ला रब्बी हंगामातील कांदा खरेदी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढील आदेशापर्यंत निर्यात बंदी

मीडियातील वृत्तानुसार, ग्राहक मंत्रालयाच्या सचिवानुसार, एक ते दोन दिवसांत ही खरेदी सुरु होईल. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. 31 मार्च रोजी त्याची अंतिम मुदत समाप्त होणार होती. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने सरकारने पुढील आदेशापर्यंत निर्यातबंदी लागू ठेवली. शरद पवार गटासह इतर काही पक्षांनी या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे.

व्यापाऱ्यांवर होणार परिणाम

गेल्यावर्षी बफर स्टॉक तयार करणे आणि आवश्यकतेनुसार बाजारात हा माल उतरविण्यासाठी जवळपास 6.4 लाख टन कांदा NAFED आणि NCCF ने खरेदी केला होता. सातत्याने कांदा खरेदी सुरु असल्याने शेतकऱ्यांना त्याचे चांगले दाम मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये सरासरी 17 रुपये किलो असा भाव होता. सध्या हा स्टॉक जवळपास संपला आहे. सध्या महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत 14-15 रुपये किलो आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही किंमत जवळपास दुप्पट आहे.

कांद्याचे उत्पादन घसरण्याची शक्यता

कृषी मंत्रालयानुसार, यावेळी रब्बी हंगामात कांदाचे उत्पादन 190.5 लाख टन होईल, असा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या 237 लाख टनापेक्षा कांद्याच्या उत्पादनात 20% घसरण दिसून आली आहे. देशात वर्षभरात कांद्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी रब्बी हंगाम महत्वपूर्ण ठरतो. वार्षिक उत्पादनात रब्बी हंगामाचा वाटा जवळपास 75% असतो. हा कांदा अनेक दिवस टिकत असल्याचा दावा करण्यात येतो.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.