AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2.50 लाख रुपये महिना पगार असलेली नोकरी हवी? मग लगेचच करा अर्ज, परीक्षेचे नो टेन्शन

RITES India Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरीवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

2.50 लाख रुपये महिना पगार असलेली नोकरी हवी? मग लगेचच करा अर्ज, परीक्षेचे नो टेन्शन
Rail India Technical and Economic Service
| Updated on: Aug 26, 2024 | 2:17 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES) लिमिटेडकडून राबवली जातंय. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

rites.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेतून एकून 11 पदे भरली जाणार आहेत. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेतून मुख्य निवासी अभियंता, वरिष्ठ नियोजन आणि वेळापत्रक विशेषज्ञ, निवासी अभियंता या पदांचा समावेश आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 ते 23 वर्षांचा अनुभव असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 63 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला अत्यंत चांगला पगार हा मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 85,000 ते 2,50,000 पर्यंत पगार मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.