AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job : TCS कंपनीत नोकरीची संधी, इतक्या तरुणांना मिळणार रोजगार..

Job : तरुणाईला TCS कंपनीत पुन्हा नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. कंपनीने एवढे कर्मचारी घेण्याची तयारी सुरु केली आहे..

Job : TCS कंपनीत नोकरीची संधी, इतक्या तरुणांना मिळणार रोजगार..
आयटी कंपनीत नोकरीची संधीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 11, 2022 | 8:11 PM
Share

नवी दिल्ली : सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) गेल्या आर्थिक वर्षात 43,000 तरुणांना नोकरी दिली होती. तर या आर्थिक वर्षात (Fiscal Year) 2022 मध्ये ही संख्या तब्बल 1 लाखांच्या वर गेली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी 2023 कंपनीने 40,000 तरुणांना नोकरी (Jobs) देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तरुणाईला संधी देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु ठेवली आहे.

या जुलै ते सप्टेंबर 2022 या दरम्यान या आयटी कंपनीने 9,840 तरुणांना नोकरी दिली आहे. तर जवळपास 20,000 फ्रेशर्सची भरती केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी 45,000 ते 47,000 फ्रेशर्संना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कंपनीने 35,000 तरुणांना कामावर ठेवले आहे.

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनीने असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांना आणखी एक सूखद धक्का दिला आहे. कंपनीने 70 टक्के कर्मचाऱ्यांसाठी 100 टक्के वेतनातील बदल सुनिश्चित केला आहे. कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी वेतनासंबंधीचा मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, 30 कर्मचाऱ्यांना त्यांच्या युनिटच्या प्रदर्शनानुसार, वेतन देण्यात येणार आहे.

टीसीएस कंपनीने मूनलाईटिंगवर पुन्हा एकदा कडक भूमिका जाहीर केली आहे. मूनलाईटिंग हे नैतिकतेच्या विरोधात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या मुद्यावरुन अजून एकाही कर्मचाऱ्याविरोधात कार्यवाही केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनीमध्ये 6.16 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

कंपनीने आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस कार्यालयात येण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. 6,16,171 कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येतात. तर बाकीच्या दिवशी त्यांना घरून काम करण्याची मूभा देण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.