AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! एसी ट्रेनमध्ये माथेफिरू शिरला… ॲसिड हल्ला केल्यानं प्रवाशांची पळापळ, नंतर काय घडलं

सावध असलेल्या माथेफिरुने त्याच्याकडे असलेल्या ॲसिड जोरात जवानांच्या दिशेन फेकले होते, यामध्ये दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान जखमी झाले आहेत.

धक्कादायक ! एसी ट्रेनमध्ये माथेफिरू शिरला... ॲसिड हल्ला केल्यानं प्रवाशांची पळापळ, नंतर काय घडलं
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 24, 2022 | 1:57 PM
Share

नाशिक : नाशिकच्या मनमाड रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात एका माथेफिरुने ॲसिडने हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटणेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली आहे. अचानक हा सर्व प्रकार समोर आल्याने रेल्वे स्थानकावर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या माथेफिरुने केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान किरकोळ जखमी झाले होते. पवन एक्सप्रेसच्या वातानुकीलीत डब्यात हा सर्व प्रकार घडल्याने रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा समोर आला असून माथेफिरुवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात असून अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी अशी मागणी देखील प्रवासी संघटना करू लागल्या आहेत.

मुंबईवरुन निघणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या डब्यात एक माथेफिरु शिरला होता, त्याने एसी डब्यात धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली होती.

माथेफिरु जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत होता, प्रवाशांनी त्याला हटकावन्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील माथेफिरु प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य करतच होता.

रेल्वेने प्रवास करत असतांना काही प्रवाशांनी आरपीएफ जवानांना ही बाब कळवली होती, लागलीच आरपीएफ जवान एसी डब्यात दाखल झाले होते.

सावध असलेल्या माथेफिरुने त्याच्याकडे असलेल्या ॲसिड जोरात जवानांच्या दिशेन फेकले होते, यामध्ये दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान जखमी झाले आहेत.

लागलीच त्याने रेल्वेच्या शौचलयात स्वतःला कोंडून घेतले होते, त्यामध्ये रेल्वे पोलीस त्याला बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र बाहेर येत नसल्याने दरवाज्या तोडून त्याला बाहेर काढले होते.

या माथेफिरुला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेत मनमाड पोलीसांच्या हवाली केले आहेत, त्याच्याकडे ॲसिड कुठून आले? रेल्वेत बसून तो कुठे जात होता याबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.

माथेफिरूचे नाव धनेशवर यादव असून तो भागलपूरचा आहे. माथेफिरुने हे कृत्य का केलं? याचाही शोध रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड तपास करत आहेत.

Follow Us
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?