AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पित्यासमान मालकावरच तो उलटला, का केला विश्वाघात ? एका फोनने सगळंच बदललं…

झटपट पैशांच्या मोहात एखादी व्यक्ती कोणतीही पायरी गाठू शकतो, अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्याला मुलासमान मानणाऱ्या इसमाचाच एकाने मोठा विश्वासघात केल्याचे समोर आले.

पित्यासमान मालकावरच तो उलटला, का केला विश्वाघात ? एका फोनने सगळंच बदललं...
| Updated on: Oct 07, 2023 | 3:21 PM
Share

बंगळुरू | 7 ऑक्टोबर 2023 : फॅक्टरीमध्ये काम करणारा तो युवक… त्याच्यासाठी तो फक्त एक कर्मचारीच नव्हता, सख्ख्या मुलासमान होता तो. एवढं प्रेम करायचा की त्याच्यासाठी तो काहीही करायला तयार होता, अगदी काहीही… पण हीच गोष्ट त्याने हेरली आणि त्याचाच गैरफायदा घेत त्याने असं कृत्य केलं, ज्याने त्याचा माणूसपणावरचा विश्वासच उडून गेला.

कर्नाटकच्या बंगळुरूमधील ही घटना वाचाल तर कदाचित तुमच्याही हृदयात कालवाकालव होईल. तेथे एका इसमाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि ज्या फॅक्टरीत काम करत होता, त्याच्याच मालकाकडे खंडणीची मागणी केली. खरंतर त्या फॅक्टरीचा मालक त्या युवकाला मुलासारखं समजायचा. त्यामुळेच आपल्याला सोडवण्यासाठी तो खंडणीचे पैसे देईलच याचा त्याला विश्वास होता. पण त्याची ही चलाखी कामी आली नाही आणि तो पकडला गेला. सध्या पोलिसांनी तो युवक आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, कथितरित्या स्वत:च्या अपहरणाचे नाटक करणारा आणि आपल्याच मालकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याचा मित्रांसह बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. आरोपी नुरूल्लाह खान आणि त्याचे साथीदार मंड्या शहरात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

खान याला सहज, झटपट पैसे कमवायचे होते, म्हणूनच त्याने स्वत:च्या अपहरणाचे नाटक रचत मालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. हा बनाव खरा वाटावा यासाठी त्याने दोन मित्रांचीही मदत घेतली.

गेल्या ५-६ वर्षांपासून खान हा एका फॅक्टरीत काम करायचा. त्या फॅक्टरीचा मालक त्याला मुलासारखंच मानायाचा, पण पैशांसाठी खानने त्याचाच विश्वासघात केला. त्याच्या योजनेनुसार, खानने फॅक्टरीच्या मालकाला फोन केला आणि अज्ञात लोकांच्या टोळीने कॅबमध्ये कोंबून आपलं अपहरण केलं, असं खोटंच सांगितलं. आणि ते खंडणीपायी दोन लाख रुपये मागत आहेत, असेही तो म्हणाल्याचे पोलिसांनी नमूद केलं.

खंडणी देण्यासाठी ते तयार झाले पण

सुरक्षेच्या कारणास्तव २७ सप्टेंबर रोजी फॅक्टरी मालकाने आर.टी.नगर पोलिसांशी संपर्क साधून, अपहरणाबद्दल आणि खंडणीच्या फोनबद्दल सांगितलं. आपण खंडणीचे पैसे देण्यासाठी तयार आहोत, फक्त खानची सुरक्षित सुटका व्हावी, अशी इच्छा असल्याचे फॅक्टरी मालकाने नमूद केले. थोड्याच वेळाने खानने फॅक्टरी मालकाला पुन्हा फोन केला आणि त्याच्या खात्यात खंडणीची रक्कम जमा करण्यासा सांगितले. मात्र यामुळे पोलिसांनी त्याच्या अपहरणाबद्दल शंका आली.

त्यांनी खानच्या फोनचे लोकेशनवर शोधले आणि तो मंड्या येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेत खान व त्याच्या मित्रांना अटक केली. आपल्याला झटपट पैसा कमवायचा असल्याने हा अपहरणाचा खोटा कट रचल्याचे त्याने चौकशीदरम्यान कबूल केले. खंडणीची रक्कम मिळाल्यानंतर तो मित्रांसोबत बिहारला पळून जायची योजनाही आखत होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.