AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime | पत्नीची हत्या करुन पती मेहुणीसह फरार, मृतदेह बंद पेटीत आढळला, बिहारमधील घटना

बिहारमधील (Bihar) बारह (Barh) जिल्ह्यातून पती-पत्नीच्या (Husband Wife) नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे पती आपल्या पत्नीचा खून (Wife Murder) करुन मेहुणीसह पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.

Bihar Crime | पत्नीची हत्या करुन पती मेहुणीसह फरार, मृतदेह बंद पेटीत आढळला, बिहारमधील घटना
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:15 PM
Share

पाटणा : बिहारमधील (Bihar) बारह (Barh) जिल्ह्यातून पती-पत्नीच्या (Husband Wife) नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे पती आपल्या पत्नीचा खून (Wife Murder) करुन मेहुणीसह पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.

बंद पेटीत मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वर्षा कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती देताना मोकामाचे एसएचओ राजनंदन शर्मा म्हणाले, ‘प्रथम दृष्‍टी हे हत्‍येचे प्रकरण असल्याचे निदर्शनास येते, कारण बंद पेटीतून मृतदेह बाहेर काढण्‍यात आला आहे. तपासात मृत शनी पासवानचा पती फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.’

या प्रकरणाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरुये. शनी पासवानने आपल्या पत्नीची हत्या केली असून हत्येनंतर तो आपल्या मेहुणीसह फरार असल्याची चर्चा आहे.

मेहुणीशी प्रेम संबंध

एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी वर्षा कुमारी यांचे शनी पासवानसोबत लग्न झाले होते. मात्र, शनी पासवानचे पत्नी वर्षाच्या बहिणीशी प्रेम संबंध होते. त्यामुळे पत्नीची हत्या करुन शनी आपल्या मेहुणीसह फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

दिल्लीत महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

राजधानी दिल्लीत (Delhi Acid Attack) 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या अ‍ॅसिड पीडितेने (Acid Attack Victim) अखेर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि तीन निरागस मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपीने तिच्या मुलांना निराधार केले आहे. त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

ही खळबळजनक घटना घडवून आणणाऱ्या आरोपीचे नाव मोंटू असून तो महिलेवर अ‍ॅसिड ओतून फरार झाला होता. मोंटूने महिलेचे हात बांधून तिच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली होती. पीडित महिलेचे 2011 मध्ये लग्न झाले होते. ती पती आणि तीन मुलांसह पूंठखुर्द येथे राहत होती. तिला नऊ वर्षांची मोठी मुलगी आणि सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.

संबंधित बातम्या :

नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा

Kerala RSS worker killed: 27 वर्षीय संघ कार्यकर्त्याची पत्नीसह बाहेर जाताना धारदार शस्त्रानी हत्या

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.