T20 World Cup 2026 : हरल्यानंतर अभिषेक शर्माबद्दल खळबळजनक खुलासा, टीम इंडियाने इतकी मोठी गोष्ट लपवली
T20 World Cup 2026 : अभिषेक शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. चालू वर्ल्ड कपमध्ये धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. तीनवेळा तो शुन्यावर आऊट झाला. एका सामन्यात पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आता त्याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय.

Abhishek Sharma T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु असताना टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी अभिषेक शर्माला गंभीर दुखापत झाली होती. पण टीम मॅनेजमेंटने या बद्दल लपवून ठेवलं. पहिल्या सामन्यात दुखापत असूनही अभिषेक फलंदाजीसाठी मैदानात उतरला. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजूनपर्यंतच त्याचं प्रदर्शन काही खास राहिलेलं नाही. चार सामन्यात त्याने 15 रन्सच केले आहेत. त्याच्या खराब प्रदर्शनामागे दुखापत हे सुद्धा एक कारण आहे.
रिपोर्ट्सनुसार, टीमच्या ऑफिशियल फोटोशूट दरम्यान अभिषेकच्या हातावर कट होता. ही घटना इतकी गंभीर होती की, त्याच्या हातावर टाके घालावे लागलेले. मात्र, त्याची फिकिर न करता अभिषेक टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये खेळला होता. USA विरुद्ध सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला होता. या मॅचमध्ये तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स प्रश्न विचारतायत की, इतकी मोठी दुखापत असून खेळण्याचा धोका का पत्करला.
नवीन दाव्याने सगळेच हैराण
दुसर्या सामन्यात आजारपणामुळे अभिषेक शर्मा बाहेर होता. पोटात बिघाड झाल्याचं कारण देण्यात आलं. टीम मॅनेजमेंटने अपडेट दिलेली की, पोटात इन्फेक्शन असल्यामुळे तो नामीबिया विरुद्ध तो खेळला नाही. अभिषेकला USA विरुद्ध खेळल्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पोट दुखी यामागचं कारण सांगण्यात आलं होतं. पाकिस्तान विरुद्ध सामन्यातून त्याने मैदानावर पुनरागमन केलं. पण आता दुखापीत संदर्भातील नवीन दाव्याने सगळेच हैराण झालेत.
त्याने या धावा केल्या
अभिषेक शर्मासाठी ही टूर्नामेंट अजूनपर्यंत तशी खास राहिलेली नाही. 4 सामन्यात त्याने 15 धावाचं केल्या आहेत. कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने या धावा केल्या. याआधी तो सर्व सामन्यात शुन्यावर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये थोड्याफार धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. अन्य मॅचमध्ये तसा तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स या दुखापतीला त्याच्या फॉर्मशी जोडत आहेत. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अन्य समीकरणही महत्वाची आहेत.
