AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं
Devendra fadnavisImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 1:46 PM
Share

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी अजित दादा हे मंत्री नसते तर काय बनले असते याविषयी देखील सांगितले आहे.

“दादांचे बालपण मामाकडे गेले”

शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दादांचे मामा हे कदम कुटुंब. ते संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा संघाचे पदाधिकारी होते. त्यांचं बालपण मामाच्या घराकडे गेलं. त्यामुळे त्यांना कार्याची जाणीव होती. दादा मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वातून पुढे आले. अजितदादांनी शिक्षण घेतल्यावर टोमॅटो लागवड आणि कुकुटपालन सुरू केलं. जमिनीतून उठून मोठं होण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच सामान्य माणसांच्या अडीअडचणी त्यांना माहिती होत्या. सहकार आणि शेती क्षेत्रात काम करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते पाहिलं तर त्यांचा भर राजकोषीय स्थैर्यावर असायचा. खर्च कमी आणि महसूल वाढी करायचे. विकासावर त्यांचं प्राधान्य असायचं. खर्चावर नियंत्रण ठेवायचं काम ते करायचे.”

मंत्री झाले नसते तर…

पुढे ते म्हणाले की, “मंत्री झाले नसते तर काय झाले असते, तर शिस्त त्यांच्या पोलिसांची आहे. ते पोलीस झाले असते. किंवा शेतकरी झाले असते. नंतर माझ्या डोक्यात आले की अजितदादा बांधकाम क्षेत्रात इंजिनियर झाले असते. उत्तमातील उत्तम काम ते करायचे. बांधकामांवर त्यांचं बारीक लक्षण असायचे. त्यावर ते लक्ष द्यायचे. प्रत्येक मालाची किंमत विचारायचे. सरकारी कामाचा एक ढाचा असतो. पण अजितदादांच्या देखरेखीत झालेली कामे अत्यंत चांगली होती. अजितदादांनी ज्या मेडिकल कॉलेजची वीट रचली त्याच मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांचा मृतदेह ठेवावा लागला. या सारखं दुर्देव नाही.”

कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा. राज्याच्या तिजोरीचा वारसा दाखवेल, पण विकास कामे थांबवणार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार