AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं
Devendra fadnavisImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 1:46 PM
Share

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी अजित दादा हे मंत्री नसते तर काय बनले असते याविषयी देखील सांगितले आहे.

“दादांचे बालपण मामाकडे गेले”

शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दादांचे मामा हे कदम कुटुंब. ते संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा संघाचे पदाधिकारी होते. त्यांचं बालपण मामाच्या घराकडे गेलं. त्यामुळे त्यांना कार्याची जाणीव होती. दादा मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वातून पुढे आले. अजितदादांनी शिक्षण घेतल्यावर टोमॅटो लागवड आणि कुकुटपालन सुरू केलं. जमिनीतून उठून मोठं होण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच सामान्य माणसांच्या अडीअडचणी त्यांना माहिती होत्या. सहकार आणि शेती क्षेत्रात काम करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते पाहिलं तर त्यांचा भर राजकोषीय स्थैर्यावर असायचा. खर्च कमी आणि महसूल वाढी करायचे. विकासावर त्यांचं प्राधान्य असायचं. खर्चावर नियंत्रण ठेवायचं काम ते करायचे.”

मंत्री झाले नसते तर…

पुढे ते म्हणाले की, “मंत्री झाले नसते तर काय झाले असते, तर शिस्त त्यांच्या पोलिसांची आहे. ते पोलीस झाले असते. किंवा शेतकरी झाले असते. नंतर माझ्या डोक्यात आले की अजितदादा बांधकाम क्षेत्रात इंजिनियर झाले असते. उत्तमातील उत्तम काम ते करायचे. बांधकामांवर त्यांचं बारीक लक्षण असायचे. त्यावर ते लक्ष द्यायचे. प्रत्येक मालाची किंमत विचारायचे. सरकारी कामाचा एक ढाचा असतो. पण अजितदादांच्या देखरेखीत झालेली कामे अत्यंत चांगली होती. अजितदादांनी ज्या मेडिकल कॉलेजची वीट रचली त्याच मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांचा मृतदेह ठेवावा लागला. या सारखं दुर्देव नाही.”

कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा. राज्याच्या तिजोरीचा वारसा दाखवेल, पण विकास कामे थांबवणार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल