AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लुटमारीच्या उद्देशाने एकाच रात्रीत चौघांवर प्राणघातक हल्ले, उल्हासनगरात चाललंय काय?

उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीच्या उद्देशाने नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकारही आता घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लुटमारीच्या उद्देशाने एकाच रात्रीत चौघांवर प्राणघातक हल्ले, उल्हासनगरात चाललंय काय?
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 23, 2023 | 1:07 PM
Share

उल्हासनगर / निनाद करमरकर : उल्हासनगरात एकाच रात्रीत लुटमारीच्या उद्देशाने चौघांवर प्राणघातक हल्ले करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रिक्षातून लुटमारीसाठी फिरणारे हे हल्लेखोर एकच होते. त्यापैकी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागरिकांवर चॉपरने हल्ला करत आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

नागरिकांवर हल्ला करत मोबाईल आणि पैसे लुटले

उल्हासनगरात बुधवारी रिक्षेतून फिरणाऱ्या या लुटारूंनी धुमाकूळ घातला. या लुटारूंनी कॅम्प 4 परिसरात तीन जणांवर चॉपरने हल्ला चढवत त्यांच्याकडून पैसे आणि मोबाईल काढून घेतले. त्यानंतर कॅम्प 1 परिसरात एकावर हल्ला करत त्याच्याकडूनही मोबाईल आणि पैसे लुटण्यात आले. या हल्ल्यात चौघेही जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

रवी निर्भवणे, विद्यानंद पांडे आणि रोहित पंडित अशी जखमी तिघांची नावं असून, एकाचे नाव कळू शकले नाही. या सर्वांना उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत दोन लुटारूंना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या हल्ल्याच्या घटनांनळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

खारघरमध्ये सोनसाखळी चोरांना अटक

नवी मुंबई परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. त्यात अनुषंगाने खारघर पोलिसांनी तपास करत सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये तब्बल 4 लाख 47 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.