AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख; ‘ती’ प्रेमाखातर पंजाबहून कोकणात आली खरी, पण…; अशी वेळ कुणावरही येऊ नये

सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून तरूणी पंजाबहून थेट रत्नागिरी दाखल झाली. पण तरुणी रत्नागिरीमध्ये येताच तिच्या प्रियकराचा फोन नॉट रिचेबल येऊ लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं तरुणीला समजलं. यावेळी एका मोबाईल दुकानदाराच्या सतर्कतेमुळे तरूणी सुखरूप आपल्या घरी पंजाबला परतली आहे.

वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख; 'ती' प्रेमाखातर पंजाबहून कोकणात आली खरी, पण...; अशी वेळ कुणावरही येऊ नये
प्रातिनिधिक फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 11, 2024 | 7:28 PM
Share

आपण सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतो. या सोशल मीडियाचा आपल्याला फायदादेखील होतो. सोशय मीडियामुळे सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील मुलं पुढे जावून खूप यशस्वी झाले. तसेच या सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आलं. याशिवाय सोशल मीडियामुळे अनेकांना लहानपणाची मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. पण असं असलं तरी काही गोष्टींचा वापर हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करायला हवा. अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा वापर करताना आपण सतर्क असायला हवं, अन्यथा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते. रत्नागिरीत असाच एक प्रकार समोर आला आहे. एक तरुणी आपल्या प्रियकरासाठी थेट पंजाबहून रत्नागिरीत आली. पण इथे आल्यावर तो तरुण तिला भेटलाच नाही. याशिवाय तिने त्याचा फोनदेखील उचलला नाही. अखेर एका मोबाईल दुकानदाराचया सतर्कतेमुळे संबंधित तरुणी ही सुखरुप पंजाबला आपल्या घरी परतली आहे.

नेमकं काय घडलं?

वर्षभरापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून पंजाबमधील तरूणीनं थेट रत्नागिरी गाठली. पण, रत्नागिरीमध्ये येताच आपली फसवणूक झाल्याची बाब या तरूणीच्या लक्षात आली. दोनच दिवसांपूर्वी झालेला संपूर्ण प्रकार तरूणीनं प्रसारमाध्यामांसमोर येत उघड केला आहे. कारण, पंजाबहून रत्नागिरीला आलेली तरूणी संबंधित तरूणाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून फोन करत होती. सोशल मीडियावर त्याला मेसेज करत होती. पण, रिप्लाय मिळत नव्हता. शिवाय, उचलला गेलेला फोन कुणा भलत्याच तरूणीनं उचलल्याचा दावा देखील या तरूणीनं केला आहे.

आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुठंतरी नोकरी शोधून पैसे कमवायचे आणि घरी परत जायचं या इराद्यानं तरूणीनं नोकरीचा शोध सुरू केला. पण, त्याचवेळी मोबाईल दुकानातील दुकानदारानं या तरूणीची विचारपूस केली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबियांशी संपर्क केला. दरम्यान, तरूणी तिच्या पंजाबमधील मोहाली येथील गावी परतली आहे. तर, तिला फसवणाऱ्या तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीचा शोध देखील सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Follow Us
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ