AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना

छत्तीसगडच्या बालोद येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या निधनानंतर 17 दिवसांनी पतीने देखील स्मशानभूमीत जावून स्वत:ला संपवलं आहे.

तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 3:03 PM
Share

रायपूर : छत्तीसगडच्या बालोद येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या निधनानंतर 17 दिवसांनी पतीने देखील स्मशानभूमीत जावून स्वत:ला संपवलं आहे. पत्नीच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच परिसरात त्याने बाभळाच्या झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मृतक पतीचं नाव मनीष नेताम असं आहे. तो धमतरी जिल्ह्यातील बोरई पोलीस ठाण्यात कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचं हेमलता नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांनी त्याच्या पत्नीचं घरातील फरशीवर पाय निसटून पडल्याने मृ्त्यू झाला होता. या घटनेपासून मनीष हा प्रचंड नैराश्यात गेला होता. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी लग्न झालं पण देवाने असं का केलं? असा सवाल तो सारखा उपस्थित करायचा.

आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट

मनीष आणि हेमलता यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे हेमलताच्या निधनाने मनीष आतून खूप खचला होता. तो गेल्या 17 दिवसांपासून दररोज हेमलताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी जावून बसायचा. तिथे तो प्रचंड रडायचा. मनीष बुधवारी (11 ऑगस्ट) देखील तिथे गेला. पण यावेळी त्याने शोकात बाभळाच्या झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषने आत्महत्या करण्याआधी आपल्या भावाला व्हाट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. त्याची ती नोट वाचून एकच खळबळ उडाली.

मनीषने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?

“आमच्या लग्नाला अवघे दोन वर्ष झाली होती. मी लताला विसरु शकत नाही. इतकी मेहमत करुन आपण सगळ्यांनी मिळून नवीन घर बनवलं, लवकर लग्नही केलं. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण परमेश्वराच्या मनात नेमकं काय होतं? त्यामुळे आता या घरात राहण्याची माझी देखील इच्छा राहिलेली नाही”, असं मनीष म्हणाला.

“छोटू, पप्पा आणि ताईंना मला माफ करायला सांग. कारण त्यांनी मला लताला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. पण मी ती जबाबदारी योग्यपणे निभावू शकलो नाही. हा फोन लताने मला गिफ्ट म्हणून दिला होता. हा फोन माझ्यानंतर छोटूने वापरावा, अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे की तो नाही म्हणेल. पण त्याला सांगा मी सांगितलंय. माझं म्हणणं जरुर ऐकावं”, असंही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं.

हेही वाचा :

आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

Follow Us
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.