AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा हत्याकांड, आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले, मग…

कल्याणमध्ये हत्येचे सत्र सुरुच आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा हत्याकांड, आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले, मग...
संशयातून अल्पवयीन मुलाची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 19, 2023 | 1:44 PM
Share

कल्याण / 19 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये हत्येचे सत्र थांबताना दिसत नाही. दररोज काही ना काही कारणातून हत्येच्या घटना घडत आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून 17 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी मुलांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. याच वादातून आरोपींनी गुरुवारी दुपारी मुलाचे कैलासनगर परिसरातून अपहरण केले. त्यानंतर आरोपी मुलाला खडेगोलवली परिसरात जंगलात घेऊन गेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी मुलाची सुटका करुन रुग्णालयात नेले

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाची सुटका केली. त्याला उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिक करत आहेत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.