AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या

आई गेल्याचे दुःख आणि त्यात वडील जेवणही व्यवस्थित देत नसल्याच्या रागातून 24 वर्षीय मुलाने जन्मदात्याला संपवले. पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दहेगाव भागात ही घटना घडली. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव आहे

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या
औरंगाबादमध्ये मुलाकडून बापाची हत्या
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 07, 2022 | 9:54 AM
Share

औरंगाबाद : मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना (Son Killed Father) समोर आली आहे. बापामुळेच आईने जाळून घेतले असल्याचा राग मुलाच्या मनात होता. याच भावनेतून मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) दहेगाव बंगला भागात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पित्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुलाने जीवे ठार मारल्याचं (Murder) समोर आलं आहे. वाळूज पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव, तर अनिल सोनवणे असे वडिलांचा खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग मुलाच्या मनात धुमसत होता.

काय आहे प्रकरण?

आई गेल्याचे दुःख आणि त्यात वडील जेवणही व्यवस्थित देत नसल्याच्या रागातून 24 वर्षीय मुलाने जन्मदात्याला संपवले. पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दहेगाव भागात ही घटना घडली. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव असून आरोपी मुलगा अनिलला वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दहेगाव बंगला या गावात 55 वर्षीय कडुबाळ सोनवणे अनिल आणि सुनील या आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. मोठा मुलगा सुनील एका हॉटेलमध्ये काम करतो, तर धाकटा अनिल घरीच असायचा. शनिवारी रात्री सुनील हॉटेलमध्येच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास त्याला वडील आजारी असल्याचं समजलं. त्याने घरी जाऊन पाहिलं असता, त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या.

नेमकं काय घडलं?

गंभीर अवस्थेत वडील घरात पडून होते. सुनीलने याची माहिती वाळूज पोलिसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी करत कडूबाळ सोनवणेंना उपचारासाठी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आईने आत्महत्या केल्याचा राग

पोलिसांनी धाकटा मुलगा अनिलला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. त्यावेळी त्याने धक्कादायक कबुली दिली. वडिलांमुळे माझ्या आईने दहा-बारा वर्षांपूर्वी जाळून घेऊन आयुष्याची अखेर केली होती. आताही ते मला नीट जेवण देत नाहीत. शनिवारी या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाला. त्यामुळे वडील झोपेत असताना त्यांचे पोट, छाती आणि गुप्तांगावर लाथा मारुन आपण त्यांना जीवे ठार मारले, अशी कबुली आरोपी मुलगा अनिल सोनवणे याने दिली.

संबंधित बातम्या :

पत्नीचा खून करण्यासाठी घेतले दुकानातून कटर अन् मुलीसाठी चॉकलेट, चेहऱ्यावर असंख्य वार, औरंगाबादेत पतीला अटक

पाया पडते, पण मुलाला मारू नका, आईच्या विनवण्या, मित्रांनी दया दाखवलीच नाही.. काय घडलं औरंगाबादेत?

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली