Bhandara | भारनियमनामुळे भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा संताप, वीज उपकेंद्रात तोडफोड, 150 जणांवर गुन्हा
मागील आठ दिवसांपासून पवनी तालुक्यात कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे 100 ते 150 शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले.

भंडारा : भारनियमनामुळे (Load shedding) शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रात तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. या प्रकरणी दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल (Bhandara Crime) करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील आसगाव येथे ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. वीज वितरण कंपनीच्या तक्रारीवरुन सुमारे दीडशे शेतकऱ्यांच्या विरोधात पवनी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 353, 332, 143, 504, 506 यासह शासकीय मालमत्ता विदृपीकरण अधिनियमाच्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
संबंधित बातम्या :
डबल, टीबल भावाने वीज खरेदी सुरू, संकट दूर होईल; भुजबळांची ग्वाही
लोडशेडिंग तत्काळ मागे घ्या, अन्यथा… खासदार इम्तियाज जलील यांनी काय दिला इशारा?
महाराष्ट्रावर वीज संकटाचे ढग? शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक;लोडशेडिंगचा फटका बसणार
