AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 01, 2022 | 7:09 AM
Share

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं आपण सर्रास ऐकतो. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी प्रतिक्रिया हायकोर्टाने दिली आहे. त्याला कारण ठरलं आहे न्यायालयात दाखल झालेलं कौटुंबिक हिंसाचाराचं (Domestic Violence) प्रकरण. आरोपी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली. पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही, असं कोर्टाने सांगितलं. 2017 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या नवी मुंबईतील एका जोडप्यात वाद सुरु होता. पतीसह सासरच्या मंडळींनी हुंडा मागितल्याचा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.

काय आहे प्रकरण?

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

हुंडा न दिल्याने सुनेला शिवीगाळ

2017 मध्ये लग्न झालेल्या पती पत्नीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा वाद सुरु आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. पतीने लग्नाच्या वेळी सोन्याच्या नाण्यांची मागणी केली होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा देण्यास नकार दिला होता. यावरुन सतत विवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली, तसंच पती वारंवार शिवीगाळ करत असल्याचाही आरोप आहे.

अटकपूर्व जामिनासाठी पती हायकोर्टात

पत्नीने 2019 मध्ये वाशीत घर खरेदी करण्यासाठी पतीला 13 लाख 50 हजार रुपये दिले होते, तरी देखील पतीकडून पैशांची सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 (अ) (पती आणि सासरच्यांकडून त्रास) हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयाचा संताप

पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही. पतीला तपासात सहकार्य करण्याचा आदेश देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया हायकोर्टाने व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.