AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 7:09 AM
Share

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं आपण सर्रास ऐकतो. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी प्रतिक्रिया हायकोर्टाने दिली आहे. त्याला कारण ठरलं आहे न्यायालयात दाखल झालेलं कौटुंबिक हिंसाचाराचं (Domestic Violence) प्रकरण. आरोपी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली. पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही, असं कोर्टाने सांगितलं. 2017 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या नवी मुंबईतील एका जोडप्यात वाद सुरु होता. पतीसह सासरच्या मंडळींनी हुंडा मागितल्याचा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.

काय आहे प्रकरण?

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

हुंडा न दिल्याने सुनेला शिवीगाळ

2017 मध्ये लग्न झालेल्या पती पत्नीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा वाद सुरु आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. पतीने लग्नाच्या वेळी सोन्याच्या नाण्यांची मागणी केली होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा देण्यास नकार दिला होता. यावरुन सतत विवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली, तसंच पती वारंवार शिवीगाळ करत असल्याचाही आरोप आहे.

अटकपूर्व जामिनासाठी पती हायकोर्टात

पत्नीने 2019 मध्ये वाशीत घर खरेदी करण्यासाठी पतीला 13 लाख 50 हजार रुपये दिले होते, तरी देखील पतीकडून पैशांची सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 (अ) (पती आणि सासरच्यांकडून त्रास) हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयाचा संताप

पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही. पतीला तपासात सहकार्य करण्याचा आदेश देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया हायकोर्टाने व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.