AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

पतीच्या निधनानंतर वियोग सहन न झाल्यामुळे दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ही घटना घडली.

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास
सोलापुरात दाम्पत्याचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 1:05 PM
Share

सोलापूर : साता जन्मांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं अनेकदा म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकताना आयुष्यभर साथ देण्याच्या घेतलेल्या आणाभाका अखेरच्या क्षणापर्यंत निभावणारे फार कमी असतात. कारण कधी जोडीदार साथ सोडून निघून जातो, तर कधी काळाच्या रुपाने नियती त्याला हिरावून नेते. पतीच्या निधनानंतर अवघ्या दीड तासांच्या काळात पत्नीनेही जगाचा निरोप (Husband Wife Death) घेतला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जवळपास 65 वर्षांच्या संसारानंतर नियतीने या दाम्पत्याची ताटातूट करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे नाते इतके घट्ट बांधले होते, की मृत्यूही त्यांना विलग करु शकला नाही. 90 वर्षांच्या पतीने अखेरचा श्वास घेतल्यानंतर केवळ 90 मिनिटांत त्यांच्या 80 वर्षीय अर्धांगिनीनेही डोळे मिटले. एकामागून एक आजी-आजोबांचे छत्र हरपल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पतीच्या निधनानंतर वियोग सहन न झाल्यामुळे दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ही घटना घडली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी लगीनगाठ बांधून चतुराबाई खुने कुटुंबात आल्या होत्या. त्यावेळी बाबुरावही जेमतेम 25 वर्षांचे होते. त्यानंतर उभी हयात दोघांनी एकत्र घालवली. त्यामुळे पतीच्या पश्चात आयुष्याची कल्पनाही सहन न झाल्यामुळे ऐंशी वर्षांच्या माऊलीने जगाचा निरोप घेतला.

आजारपणामुळे पतीचे निधन

65 वर्षांपासून संसारात साथ देणाऱ्या पतीच्या निधनाने धक्का बसलेल्या पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला. पतीचे आजारपणामुळे निधन झाले, त्यानंतर दुःख सहन न झाल्याने दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले.

कुटुंबीयांवर दुःखाचा आघात

बाबुराव खुने (वय 90 वर्ष) आणि चतुराबाई खुने (वय 80 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. एकामागून एक पती-पत्नीने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत आहेत. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

लेकाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना दाम्पत्यावर काळाचा घाला, कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

VIDEO : ब्रेक फेल झालेला टेम्पो आठवडी बाजारात घुसला, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, 16 जण जखमी

पेस्ट कंट्रोलनंतर हलगर्जी जीवावर, पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.