AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करून 13 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी चार दलालांना अटक झाली असून त्यात तीन महिला आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
| Edited By: | Updated on: Jan 09, 2025 | 10:39 PM
Share

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई केली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला आहे. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 4 दलालांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या 4 दलालांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी आता कल्याण रेल्वे स्टेशनवरील असे प्रकार थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात बऱ्याचदा सर्रासपणे वारंगणा हिंडताना दिसतात. कल्याणच्या स्कायवॉकवर त्यांना वावर दिसतो. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचादेखील मोठा समावेश असतो. पण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वारंगणामुळे सर्वसामान्य महिलांना रात्रीच्या सुमारास ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींची दखल घेत तिथे छापा टाकला. पोलिसांना या कारवाईत मोठे यश आले. पोलिसांनी एकूण 13 महिलांची यातून सुटका केली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना अनेक अडचणी

दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे कल्याण पूर्वेला लोकग्रामच्या दिशेला जोडणारा ब्रिज हा गेल्या सहा वर्षांपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. हजारो प्रवासी रेल्वे रुळ पार करुन जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. हे प्रवासी सातत्याने पूल कधी बनेल? याची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे आता तर त्या वाटेला प्रचंड पाणी आणि चिखल होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळेला या वाटेतून जाणं देखील तितकं सुरक्षित नाही. त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.