AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करून 13 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी चार दलालांना अटक झाली असून त्यात तीन महिला आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
| Edited By: | Updated on: Jan 09, 2025 | 10:39 PM
Share

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई केली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला आहे. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 4 दलालांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या 4 दलालांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी आता कल्याण रेल्वे स्टेशनवरील असे प्रकार थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात बऱ्याचदा सर्रासपणे वारंगणा हिंडताना दिसतात. कल्याणच्या स्कायवॉकवर त्यांना वावर दिसतो. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचादेखील मोठा समावेश असतो. पण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वारंगणामुळे सर्वसामान्य महिलांना रात्रीच्या सुमारास ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींची दखल घेत तिथे छापा टाकला. पोलिसांना या कारवाईत मोठे यश आले. पोलिसांनी एकूण 13 महिलांची यातून सुटका केली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना अनेक अडचणी

दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे कल्याण पूर्वेला लोकग्रामच्या दिशेला जोडणारा ब्रिज हा गेल्या सहा वर्षांपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. हजारो प्रवासी रेल्वे रुळ पार करुन जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. हे प्रवासी सातत्याने पूल कधी बनेल? याची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे आता तर त्या वाटेला प्रचंड पाणी आणि चिखल होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळेला या वाटेतून जाणं देखील तितकं सुरक्षित नाही. त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.