AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करून 13 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी चार दलालांना अटक झाली असून त्यात तीन महिला आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jan 09, 2025 | 10:39 PM
Share

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई केली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला आहे. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 4 दलालांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या 4 दलालांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी आता कल्याण रेल्वे स्टेशनवरील असे प्रकार थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात बऱ्याचदा सर्रासपणे वारंगणा हिंडताना दिसतात. कल्याणच्या स्कायवॉकवर त्यांना वावर दिसतो. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचादेखील मोठा समावेश असतो. पण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वारंगणामुळे सर्वसामान्य महिलांना रात्रीच्या सुमारास ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींची दखल घेत तिथे छापा टाकला. पोलिसांना या कारवाईत मोठे यश आले. पोलिसांनी एकूण 13 महिलांची यातून सुटका केली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना अनेक अडचणी

दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे कल्याण पूर्वेला लोकग्रामच्या दिशेला जोडणारा ब्रिज हा गेल्या सहा वर्षांपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. हजारो प्रवासी रेल्वे रुळ पार करुन जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. हे प्रवासी सातत्याने पूल कधी बनेल? याची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे आता तर त्या वाटेला प्रचंड पाणी आणि चिखल होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळेला या वाटेतून जाणं देखील तितकं सुरक्षित नाही. त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा