AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Firing Update : भांडणाच्या रागातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबार, जाब विचारणाऱ्या प्रवाशांनाही सोडले नाही !

जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबल आणि ASI च्या वादात तीन निष्पाप प्रवाशांचाही बळी गेला आहे.

Mumbai Train Firing Update : भांडणाच्या रागातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबार, जाब विचारणाऱ्या प्रवाशांनाही सोडले नाही !
आपसातील वादातून कॉन्स्टेबलकडून एएसआयवर गोळीबारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 31, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूरहून मुंबईकडे येत असलेल्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटे 5.23 वाजता पालघर स्थानकादरम्यान गोळीबाराची घटना घडली. या घटनेत आरपीएफच्या ASIसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला. एस्कॉर्ट ड्युटीवर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन आणि ASI टीकाराम यांच्या काही कारणातून वाद झाला. हा विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात कॉन्स्टेबलने स्वतःकडील सर्व्हिस रायफलने ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करत त्याला जाब विचारण्यास सुरवात केल्याने चेतने तीन प्रवाशांवरही गोळीबार केला. यानंतर आरोपीने चैन ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपी पोलिसांनी त्याला पकडले.

आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बोरीवली लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यानंतर आजच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरपीएफच्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान काही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जवानांना तैनात केले जाते.

एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात जवानांमध्ये वादातून गोळीबार

आरोपी चेतन आणि मयत ASI दोघेही पॅसेंजरमधील बी-5 या एसी बोगीत एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होते. सूरत-मुंबई अशी दोघांची ड्युटी होती. दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून चेतने ASI टीकारामवर गोळी झाडली. ASI वर गोळी झाडल्याने तेथील प्रवाशांनी आरडाओरजा करण्यास सुरवात केली. प्रवाशांनी कॉन्स्टेबलला जाब विचारायला सुरवात करताच आरोपीने त्यांच्यावरही गोळीबार केला.

आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न फसला

यानंतर पॅसेंजर मीरा-रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान येताच आरोपीने चैन खेचून ट्रेनमधून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपीने त्याला पकडले. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी क्रॉस फायरिंग झाली का याबाबतही चौकशी सुरु आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.