AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vainganga River | ‘जीवनदायिनी’ वैनगंगा ठरतेय ‘मृत्यूवाहिनी’, दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या

भंडारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात तब्बल 17 जणांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. लोकांची मानसिकता लक्षात घेता ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vainganga River | 'जीवनदायिनी' वैनगंगा ठरतेय 'मृत्यूवाहिनी', दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या
भंडाऱ्यातील वैनगंगा नदी ठरतेय सुसाईड पॉईंटImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 9:13 AM
Share

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील वैनगंगा नदी (Vainganga River) स्थानिक शेतकरी आणि उद्योजकांचे भरण-पोषण करत असल्यामुळे तिला जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. मात्र काही वर्षापासून याच वैनगंगा नदीत अनेक जणांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं समोर आलं आहे. जवळपास 17 जणांनी वैनगंगेत आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे ही जीवनदायिनी नदी मृत्यूवाहिनी संबोधली जाणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

वैनगंगेमुळे शेती सुजलाम-सुफलाम

भंडारा जिल्ह्याला वैनगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. या वैनगंगेच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेती सुजलाम-सुफलाम झालेली आहे. तर अनेक जिल्ह्यातील उद्योजकांना भरभराट आली आहे. मात्र मागील दीड वर्षापासून हीच वैनगंगा नदी आत्महत्येचा स्पॉट होत असल्याने गालबोट लागले आहे.

दीड वर्षात तब्बल 17 जणांची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात तब्बल 17 जणांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. लोकांची मानसिकता लक्षात घेता ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे वैनगंगा महोत्सव साजरा करत वैनगंगा नदीचे सुजलाम-सुफलामतेचे गुणगान गायले जात आहे. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी वाहत असलेले मृतदेह पाहून वैनगंगा नदीला सुद्धा रडू येत आहे.

पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी

पोलीस प्रशासनाने या संबंधित सुसाईड स्पॉटला शोधून त्या ठिकाणी पोलिस सुरक्षा पुरवण्याची मागणी जनमानसातून केली जात आहे. जेणेकरुन नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती आपल्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्यास आल्यास त्यांचे प्राण बचावतील.

संबंधित बातम्या :

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

धुळवडीनंतर अंघोळीला नदीवर गेला युवक, पोहता येत नसल्याने वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

माय लास्ट लोकेशन इज…, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, पुलावर सायकल, भंडाऱ्यात ITI च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.