AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती-जेजुरी रोडवर कारची बाईकला धडक, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या

बारामती-जेजुरी रस्त्यावरील आंबी गावाच्या हद्दीत भरधाव कारने कोलते यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत कोलते दाम्पत्य जागीच ठार झाले

बारामती-जेजुरी रोडवर कारची बाईकला धडक, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या
पोलीस स्टेशनबाहेर मृतांच्या नातेवाईकांचा ठिय्याImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 7:21 AM
Share

बारामती : पुणे जिल्ह्यात दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघाती मृत्यू (Couple Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती-जेजुरी रस्त्यावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Pune Accident) पती-पत्नीचा मृत्यू झाला. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब कोलते आणि सविता कोलते यांना या अपघातात प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर (Baramati Bike Accident) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मोरगाव पोलिस दूरक्षेत्राबाहेर मृतदेहासह तब्बल चार तास ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले.

नेमकं काय घडलं?

याबाबत माहिती अशी की, बारामती-जेजुरी रस्त्यावरील आंबी गावाच्या हद्दीत भरधाव कारने कोलते यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत कोलते दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. अपघातानंतर कार चालक दत्तात्रय साळुंके याला पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळात सोडून दिल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी पोलिस दूरक्षेत्रात गर्दी केली. संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह घेऊन जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली

मृत दाम्पत्याच्या नातेवाईकांचा ठिय्या

तब्बल चार तासांहून अधिक काळ नातेवाईकांनी मृतदेह पोलीस दूरक्षेत्रासमोर ठेवले होते. कारवाई झाल्याशिवाय पोलीस ठाण्यासमोरुन हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा कोलते यांच्या नातेवाईकांनी घेतला. काळी वेळानंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे पोलीस उप विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी कोलते दाम्पत्याचे मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी नेले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.