AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटचं भेटू आणि थांबू, 14 वर्षांच्या प्रेमाचा थरारक अंत, पुण्यातील धक्कादायक प्रेम कहाणी

चौदा वर्षांपासून प्रेमप्रकरण असूनसुद्धा लग्न करण्यासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (pune man murdered lover)

शेवटचं भेटू आणि थांबू, 14 वर्षांच्या प्रेमाचा थरारक अंत, पुण्यातील धक्कादायक प्रेम कहाणी
सांकेतिक फोटो
| Updated on: Apr 01, 2021 | 8:35 PM
Share

पुणे : चौदा वर्षांपासून प्रेमप्रकरण असूनसुद्धा लग्न करण्यासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव असून पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. एकदा शेवटचं भेटण्याच्या बहाण्याने या प्रियकराने मनीषाला बोलावून घेतले होते. खून केल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून सागर गुडाव असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. (Pune man murdered his lover denying marry with him were in relationship from 14 years)

प्रेयसीला शेवटचं भेटायला बोलवलं

मिळालेल्या माहितीनुसार मनीषा आणि सागर दोघेही अमरावती येथील रहिवासी आहेत. मागील 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु कुटुंबियांच्या विरोधामुळे मनीषा लग्न करण्यासाठी नकार देत होती. सागर तिला सातत्याने फोन करायचा. परंतु सागरच्या फोनलासुद्दा ती प्रतिसाद देत नव्हती. दरम्यान तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून सागरने 13 मार्च रोजी मनिषाला भेटायला बोलावले. यावेळी दोघेही दुचाकीवरुन फिरण्यासाठी बाहेर पडले.

दोघेही धरणाच्या दिशेने निघाले, आणि…

घराबाहेर पडल्यानंतर महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी जाण्याचा दोघांचाही प्लॅन होता. परंतु तो प्लॅन रद्द करून दोघेही भाटघर धरणाच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनीषा बेसावध असताना आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर मनिषाचा खून करुन सागर घटनास्थळावरून पसार झाला. मागील 17 दिवसांपासून पोलीस या घटनेचा तपास करत होते. काल (31 मार्च) या आरोपीला अटक करण्यात आली.

दरम्यान, तब्बल 14 वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही आरोपी सागरने आपल्या प्रेयसीचा खून केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शेवटचं भेटायला येण्याचा आग्रह करुन थेट डोक्यात दगड घालून खून केल्यामुळे आरोपी प्रियकर सागरविरोधात रोष व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

झोपलेल्या सावत्र आईवर कुऱ्हाडीचे वार, हत्येप्रकरणी सांगलीत मुलाला अटक

31 डिसेंबरला पोटच्या गोळ्याने आत्महत्या केली, तीन महिन्यांनी तिथेच माऊलीनेही आयुष्य संपवलं

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांचा महिलेवर बलात्कार, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

(Pune man murdered his lover denying marry with him were in relationship from 14 years)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.