AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रूपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, महिलांच्या संदर्भात पत्रात काय म्हंटलंय…

राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माहिती घेत त्याचा निष्कर्ष काढून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे.

रूपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, महिलांच्या संदर्भात पत्रात काय म्हंटलंय...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 13, 2022 | 2:32 PM
Share

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष (State Women Commission President) रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात या पत्रात नमूद केले आहे. राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होत असल्याचा मुद्दा चाकणकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पत्रात नमूद करत महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. राज्यातील महिलांना सुरक्षिततेचे वातावरण तसेच त्यांचा आत्मविश्वास कायम रहावा यासाठी आपण आपल्या स्तरावर संबंधितांना सुचना देण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माहिती घेत त्याचा निष्कर्ष काढून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे.

राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले असून चाकणकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या सनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे.

या गोष्टींशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट करत अंमलबजावणीसाठी विनंती केली आहे.

राज्यातील शहरी, ग्रामीण भागातील महिला व मुली बेपत्ता होत असल्या बाबतच्या बातम्या सातत्याने येत असल्याने राज्य महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा पत्रात उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

राज्य महिला आयोग अधिनियम 1993 मधील कलम 10 (1) (जे) नुसार स्त्रियांना सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणेस सक्रिय करणे हा आयोगाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. असा उल्लेख करत कर्तव्याबाबत आठवण करून दिली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रावर येत्या काळात काय अंमलबजावणी होते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...