AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना सापाला घाबरली ना जंगली प्राण्यांना! भीती फक्त माणसांची.. 8 वर्षे मुलींना घेऊन गुहेत राहिली रशियन महिला

Karnataka Cave Women: रशियाची नीना कुटीना आपल्या मुलींसह अनेक वर्षांपासून गोकर्णच्या गुहेत राहत होती. सोशल मीडियावर आपली व्यथा शेअर करताना नीना म्हणाली, "जंगल सुरक्षित होते, माणसे नाही."

ना सापाला घाबरली ना जंगली प्राण्यांना! भीती फक्त माणसांची.. 8 वर्षे मुलींना घेऊन गुहेत राहिली रशियन महिला
Russia WomenImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 15, 2025 | 2:15 PM
Share

कल्पना करा, एखादी स्त्री आपल्या मुलांसह शहर सोडून गुहेत राहायला लागली… ना वीज, ना इंटरनेट, ना पक्के छत, फक्त निसर्गाच्या सान्निध्यात. मोकळे आकाश, गवत, धबधब्याचा आवाज आणि जंगलातील शांती. असेच काहीसे रशियाची नीना कुटीना आणि तिच्या दोन मुली करत होत्या. त्या भारतातील कर्नाटक राज्यातील गोकर्णजवळील एका गुहेत अनेक वर्षांपासून राहत होत्या. तिथे त्यांना शांती मिळत होती. त्यांना पावसाचा आनंद वाटायचा, त्या सापांना घाबरत नव्हत्या आणि त्या म्हणाल्या की जंगलात शहरांपेक्षा जास्त सुरक्षित वाटले.

पोलिसही चकित झाले!

पण अचानक पोलिस तिथे पोहोचले. त्यांनी नीना आणि तिच्या मुलांना त्या गुहेतून बाहेर काढले. सुरुवातीला त्यांना जवळच्या कुमटा परिसरातील एका आश्रमात ठेवण्यात आले. काही दिवसांनंतर सरकारी आदेशानुसार त्यांना तुमकुरू जिल्ह्यातील डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आता त्या म्हणतात की त्या जणू तुरुंगासारख्या वातावरणात अडकल्या आहेत. ना आकाश दिसते, ना हिरवळ, ना ताजी हवा. त्यांना थंड आणि कठीण जमिनीवर झोपावे लागत आहे.

वाचा: सुहागरात्रीला नवरीला आली चक्कर, नवऱ्याने थेट आणलं प्रेग्नंसी किट… नंतर जे घडलं गावकरीही थक्क झाले

सोशल मीडियावर शेअर केली कहाणी

नीनाने आपली गोष्ट सोशल मीडियावर लोकांसह शेअर केली. तिने लिहिले की, यापूर्वी त्यांचे ‘घर’ एक सुंदर गुहा होती. तिथे धबधब्याचा आवाज यायचा, मुलांना खेळण्यासाठी गवत होते आणि आयुष्यात शांती होती. पण आता त्या अशा ठिकाणी आहेत ज्याला त्या ‘कैद’ म्हणतात. त्या लिहितात, “आमचे गुहेतील आयुष्य संपले. आता आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथे काहीच नाही. ना आकाश, ना धबधबा, फक्त एक थंड जमीन आहे.”

नीनाला अटक का झाली?

आता प्रश्न पडतो की, नीना आणि तिच्या मुलींना पोलिसांनी का हटवले? खरेतर, नीना 2016 मध्ये रशियातून बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तिने गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये काही काळ कामही केले. पण जेव्हा तिचा व्हिसा संपला, तेव्हाही ती भारतात राहिली. 2018 मध्ये तिला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ती नेपाळला गेली आणि पुन्हा गोकर्णला परतली. तिचा पासपोर्टही 2019 मध्ये कालबाह्य झाला होता. त्यामुळे आता सरकार तिला रशियाला परत पाठवण्याची तयारी करत आहे.

नीनाचा प्रश्न “माणूसच सर्वात धोकादायक आहे का?”

नीनाचा म्हणणे आहे की, जंगलात तिला कधीही कोणत्याही प्राण्यापासून धोका जाणवला नाही. ना सापाने चावले, ना कोणत्याही प्राण्याने हल्ला केला. पण माणसांपासून तिला नेहमीच भीती वाटली. ती म्हणते की, माणूस हाच एकमेव असा प्राणी आहे जो दुसऱ्यांना त्रास देतो. मग ते प्राणी असोत वा स्वतःसारखी माणसे. तिच्या मते, “निसर्गाने आम्हाला कधीही त्रास दिला नाही. माणसांनी नेहमीच छळले.”

आता पुढे काय होईल?

सरकारने स्पष्ट केले आहे की, नीना यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल. पण जोपर्यंत त्या तिकीट खरेदी करत नाहीत, तोपर्यंत त्यांना तुमकुरूच्या डिटेंशन सेंटरमध्येच राहावे लागेल. त्या अजूनही आशा बाळगत आहेत की, कदाचित काही मार्ग निघेल आणि त्या पुन्हा त्यांच्या जुन्या आयुष्याकडे, निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या हवेत परत जाऊ शकतील.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.