बलात्काराच्या घटनेवर लोकं भडकली, रस्त्यावर मोठा गदारोळ आणि जाळपोळ, गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून गोळीबार

आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

बलात्काराच्या घटनेवर लोकं भडकली, रस्त्यावर मोठा गदारोळ आणि जाळपोळ, गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून गोळीबार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:53 PM

गुवाहाटी (आसाम) : महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. मुंबईत साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेने तर दहा वर्षांपूर्वीच्या निर्भया हत्याकांडाची आठवण करुन दिली. या घटनांवर आळा बसावा यासाठी योग्य पावलं उचलणं जास्त आवश्यक आहे. दरम्यान आसाममधून एक भयानक घटना समोर आली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांनी निदर्शने देत परिसरात जाळपोळ केली.

नेमकं प्रकरण काय?

कछर जिल्ह्यातील सिलचर येथील आश्रम रोड परिसरात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन मुलगी रविवारपासून (12 सप्टेंबर) बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. अखेर बुधवारी (15 सप्टेंबर) पीडितेचा मृतदेह सिलचरच्या मधुरा घाट येथे आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या या अवस्थेमागे रोनी दास नावाच्या व्यक्तीचा हात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. रोनी दास यानेच पीडितेचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केली, असा आरोप स्थानिकांनी केला.

स्थानिकांना संताप अनावर

पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांना संताप अनावर झाला होता. त्यांनी निदर्शने देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीतील काहींनी घोषणाबाजी करताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या. तसेच त्यांनी सुरक्षाकर्मींवर दगडफेक केली. आरोपी रोनी दासच्या नातेवाईकांच्या दुकानांना आग लावण्यात आली. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण गर्दी त्यांच्याही नियंत्रणाबाहेर गेली. अखेर या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार सुरु केला.

पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका काय?

विशेष म्हणजे पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याआधी आंदोलनकर्त्यांना विनंती केली होती. आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण आंदोलक तरीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी अनेकांनी दुकांनांना लूटुन हात साफ करुन घेतला. गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी या गदारोळाचं समर्थन केलेलं नाही. संबंधित भूमिका ही आपली भूमिका नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

पीडितेच्या वडिलांचे सहा जणांवर गंभीर आरोप

परिस्थितीला निंयत्रणात करण्यासाठी घटनास्थळी 147 सीआरपीएफ जवान, फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आल्या. तसेच डीआयजीपासून अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आली. दुसरीकडे याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीवर सहा आरोपींकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्या सहा आरोपींना मृत्यूदंड देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.