AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये पुन्हा मोटारसायकल जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या पेटवल्या !

कल्याणमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पुन्हा एकदा समाजकंटकांकडून वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सुरु झाले आहे. या गुन्हेगारांना आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कल्याणमध्ये पुन्हा मोटारसायकल जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या पेटवल्या !
कल्याणमध्ये वाहनांची जाळपोळImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 8:05 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा एकदा वाहनांचे जळीतकांड सुरु झाले आहे. चिंचपाडा गावात पुन्हा एकदा पार्किंग असलेल्या गाड्यांना आग लावण्याची घटना घडली आहे. या आगीत तीन मोटरसायकल आणि एक चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आग कोणी लावली आणि का लावली याचा तपास पोलीस करत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा धाकच राहिला नाही हे या घटनेवरुन दिसून येते.

समाजकंटकांनी चार गाड्या जाळल्या

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात पाण्याच्या टाकीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. समाजकंटकांनी चार गाड्यांना आग लावली असून, या आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चिंचपाडा परीसरात रंदीप साळुंखे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. रंदीप आणि त्यांचा भाऊ उल्हासनगर परिसरात रिक्षा चालवतात. त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावर चार गाड्या पार्किंग करण्यात आल्या होत्या.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रात्रीच्या वेळी मोठा आवाज झाला तेव्हा नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी साळुंखे कुटुंबीयांनी तळमजल्यावर धाव घेतली. यावेळी कोणीतरी अज्ञात इसमांनी वाहनांना आग लावल्याचे निदर्शनास आले. या आगीत 3 मोटार सायकल आणि एक चारचाकी गाडी जळाली आहे. याप्रकरणी रंदीप साळुंखे यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.