AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी विष घेतलंय… इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकताच मेटाचा अलर्ट, 10 मिनिटांत पोलिसांनी वाचवला जीव!

मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील एका तरुणीने उंदराचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना त्याने इन्स्टाग्रामवर मी विष घेतले आहे, असे स्टेटस ठेवले होते. फेसबुकच्या सिस्टिमने या स्टेटसची नोंद घेतली. लगेच पोलिसांना याबाबत सांगितले.

मी विष घेतलंय... इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकताच मेटाचा अलर्ट, 10 मिनिटांत पोलिसांनी वाचवला जीव!
up police
| Updated on: Aug 04, 2025 | 8:29 PM
Share

UP Crime News : सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आघडीला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया वापरतोच. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे तसे शेकडो उदाहरणं आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यान, एकीकडे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मानवी स्वास्थ बिघडत आहे, असे सांगितले जात असले तरी एक अजब प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमुळे एका तरुणाचा चक्क जीव वाचला आहे. पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत सूत्र हालवून तरुणाला वाचवलं आहे.

मेटाकडून संदेश मिळताच पोलिसांनी…

सध्या समोर आलेला हा प्रकार उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील आहे. येथे पोलिसांनी एका इन्स्टाग्राम स्टेटसमुळे अवघ्या दहा मिनिटांत एका तरुणाचा जीव वाचवला आहे. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने पोलिसांना अलर्ट करताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेटाकडून संदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेतली आणि तरूणाच्या घरी जाऊन त्याचा जीव वाचवला आहे. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार केला जात असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील एका तरुणीने उंदराचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना त्याने इन्स्टाग्रामवर मी विष घेतले आहे, असे स्टेटस ठेवले होते. फेसबुकच्या सिस्टिमने या स्टेटसची नोंद घेतली. लगेच पोलिसांना याबाबत सांगितले.

पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं अन्…

पोलिसांनीही मेटा कंपनीचा मेल येताच तत्काळ अॅक्शन घेतली. ज्या ठिकाणाहून तरुणाने हे स्टेटस ठेवले होते, त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या घरी जाऊन त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मेटाच्या मदतीने आतापर्यंत पोलिसांनी वाचवले अनेकांचे प्राण

पोलीस जेव्हा तरुणाच्या घरी पोहोचले होते तेव्हा तो तरूण बेशुद्धावस्थेत पडला होता. कोणताही उशीर न करता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाचे प्राण वाचवले. दरम्यान, आतापर्यंत मेटा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी एकमेकांच्या सहकार्याने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचवलेले आहेत. 2023 ते 2025 या काळात मेटाच्या मदतीने एकूण 1,195 लोकांचा जीव वाचवलेला आहे.

Follow Us
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?