AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या

आरोपी आणि मयत तरुण हे दोघेही चुलत भाऊ आहेत. रामसिंगचे त्याच्या विधवा बहिणीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 24, 2021 | 7:36 AM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर-39 परिसरातील हाजीपूरजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. विधवा चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे.

आरोपींच्या ताब्यातून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सेक्टर-39 पोलिसांना माहिती मिळाली की, हाजीपूर सोसायटीच्या गेट क्रमांक 2, सेक्टर-104 येथे एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. रामसिंग असे 32 वर्षीय मृताचे नाव असल्याचे तपासात समोर आले. तो शाहजहानपूर येथील जलालाबादचा रहिवासी होता. त्याचा भाऊ राजेश कुमार याने पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दोघांना अटक, तिसरा पसार

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले होते. पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून सुगावा लागला आणि जलालाबाद येथील मोहन याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आणि खुनात वापरलेला चाकूही जप्त केला. या हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध सुरु आहे.

अनैतिक संबंधातून हत्या

अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, आरोपी आणि मयत तरुण हे दोघेही चुलत भाऊ आहेत. रामसिंगचे त्याच्या विधवा बहिणीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मोफत जेवण देलं नाही, मुंबईतील पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना

पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?