AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरारमध्ये हायप्रोफाईल कॉल सेंटरचा पर्दाफाश, परराज्यातील 49 आरोपींना अटक

एका फार्महाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर सुरु होते. परराज्यातील तरुण-तरुणी कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. राजोडी समुद्र किनाऱ्यावर राजरोसपणे हा धंदा सुरु होता.

विरारमध्ये हायप्रोफाईल कॉल सेंटरचा पर्दाफाश, परराज्यातील 49 आरोपींना अटक
विरारमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाशImage Credit source: TV9
| Updated on: Apr 11, 2023 | 1:50 PM
Share

विरार / विजय गायकवाड : विरारमध्ये अर्नाळा सागरी पोलिसांनी एका हायप्रोफाईल कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 49 तरुण-तरुणींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात भादवी कलम 419, 420, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43, 66, 66 (क), 66 (ड), 75 आणि भारतीय टेलिग्राम कायदा कलम 25 प्रमाणे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजोडी समुद्रकिनारी फार्म हाऊनसमध्ये सुरु होते कॉल सेंटर

राजोडीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये थाटलेल्या बोगस कॉल सेंटरवर अर्नाळा पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालविणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या जागा मालक अशा तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल करून 11 तरुणी व 39 तरुणांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार नवीन भूपेंद्रकुमार भूताने अद्यापही फरार आहे.

हे सर्वजण दिल्ली, पंजाब, हरियाणा राज्यातील रहिवासी असून, उच्च शिक्षित आहेत. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील पे पाल बँकेच्या खातेदारकांच्या खात्यातील पैसे लुटण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमधून केले जात होते. हे कॉल सेंटर मागील दीड महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला छापा

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर राजोडी येथील OAC पेंट बुल अरेना रिसॉर्टमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली होती. रविवारी पहाटे पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारला. यावेळी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. रविवार दिवसभर ही कारवाई सुरू होती.

या छाप्यात एकूण 49 तरुण-तरुणींना अटक केली आहे. आरोपींकडून 20 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.