AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहेरी जाण्यास सासरच्यांचा होता विरोध, म्हणून बहिणीच्या लग्नापूर्वी महिलेने जे कृत्य केलं….

राजस्थानमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेने तिच्या दोन लहान मुलांसह स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

माहेरी जाण्यास सासरच्यांचा होता विरोध, म्हणून बहिणीच्या लग्नापूर्वी महिलेने जे कृत्य केलं....
Image Credit source: tv9
| Updated on: May 04, 2023 | 11:50 AM
Share

बारमेर : राजस्थनच्या बारमेर जिल्ह्यातील चौहान पोलीस स्टेशन परिसरातून 3 जणांचा मृत्यू (3 people died) झाल्याची माहिती समोर आली आहे. सासरच्या व माहेरच्या मंडळींच्या परस्पर वादातून मयत महिलने दोन लहान मुलांसह स्वत:चेही (woman killed children and herself) आयुष्य संपवले आहे. तिने प्रथम दोन मुलांचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या बहिणीचे अवघ्या पाच दिवसांनी लग्न होणार होते.

बहिणीच्या लग्नासाठीच तिला तिच्या माहेरच्या घरी जायचे होते, पण याला त्या महिलेचा नवरा आणि सासरच्यांचा विरोध होता. यामुळे संतापलेल्या महिलेने हे भयानक पाऊल उचलले. दोन निष्पाप मुले आणि आईचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस स्टेशन हद्दीतील लिलसर गावातील रहिवासी असलेल्या सत्तारामचा विवाह झांफली गावातील सोनी देवी यांच्याशी 12 वर्षांपूर्वी झाला होता, मात्र काही काळानंतर त्या दोघांच्या कुटुंबियांमध्ये (सासरचे व माहेरचे लोक यांच्यामध्ये) वाद झाला. सत्तारामच्या एका भावाचा आणि बहिणीचा विवाह सोनीदेवीच्या बहिण-भावाशी झाला होता.

माहेरी जाण्यास होता विरोध

लग्नानंतर लगेचच काही कारणामुळे दोन्ही कुटुंबात कडाक्याचं वाद झाला आणि नातं तुटलं. त्यांचं भांडण आणि तुटलेलं नातं, यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी येणे-जाणेही बंद झाले. सोनीदेवी यांना मुले झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहू लागली. ती क्वचितच माहेरी जात असेल, मात्र ते तिच्या सासरच्या मंडळींना पसंत नव्हते. या कारणावरून त्यांचे सासरच्या मंडळींशी खूप वाद होत होते.

बहिणीच्या लग्नासाठी माहेरी जायची होती इच्छा

या दरम्यान सोनीदेवी हिच्या बहिणीचे लग्न ठरले होते व तिला तिच्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी जायचे होते. मात्र पती सत्ताराम व त्याचे कुटुंबीय या गोष्टीवर नाराज असल्याने त्यांच्यात वाद झाला, तो इतका वाढला की, सोनीदेवीने आपल्या दोन निष्पाप मुलांची हत्या केली आणि स्वतःलाही पेटवून घेतले. त्यामुळे गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णांलयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाडमेर रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. यासोबतच पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांनाही माहिती दिली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...