AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे.

CTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली
CBSE Board
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 23, 2021 | 1:57 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी ही घोषणा 3 जून रोजी केली होती. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळानं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची मुदत 7 वर्षांवरुन कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईनं याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. (CBSE extends CTET validity of certificate from 7 years to lifetime)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एनसीटीईच्या नोटीसनंतर सीबीएसईनं हे परिपत्रक जारी केलं आहे. टीईटी प्रमाणपत्र यापूर्वी 7 वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरलं जायचं. शिक्षकांची नेमणूक करताना टीईटी प्रमणापत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. सीटीईटीच्या यापूर्वीच्या प्रमाणपत्रांवर ती 7 वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असतील, असा उल्लेख असेल ती प्रमाणपत्र आता आयुष्यभरासाठी वैध असतील.

सीबीएसई नवी प्रमाणपत्र देणार नाही

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नव्यानं प्रमाणपत्र देणार नाही. जुनीच प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध असतील.

सीबीएसईकडून सीटीईटी परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून नोकरी करता येते. केंद्र सरकारच्या किंवा सीबीएसईच्या कक्षेत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या वर्गाच्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. जुलै आणि डिसेंबर दरम्यान होणारी परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती.

शिक्षक आणि उमेदवारांना मोठा दिलासा

शासकीय शाळांमधील शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आणि ज्या शिक्षकांनी यापूर्वी टीईटीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल पण मुदत संपली असेल त्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 2011 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्र आयुष्यभर वैध असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री हा निर्णय शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारा असल्याचं म्हणाले.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा घेण्यासाठी हट्ट का?, धनंजय कुलकर्णींना कोर्टाची विचारणा, याचिका मागे घेतल्याने निकाली

बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

(CBSE extends CTET validity of certificate from 7 years to lifetime)

Follow Us
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका