AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राची पीएम श्री योजना आहे तरी काय ? केंद्राची योजना राज्यात लागू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरीही देण्यात आली आहे.

केंद्राची पीएम श्री योजना आहे तरी काय ? केंद्राची योजना राज्यात लागू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Image Credit source: Google
| Updated on: Feb 14, 2023 | 4:06 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री ( PM Shri school ) योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास पंधरा हजार शाळांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे म्हंटले होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र ( Maharashtra News ) राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरीही देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या योजनेत राज्यसरकारसह केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही सहभाग घेता येणार असून महाराष्ट्रात त्याबाबतचा निर्णय झाला असून आज पीएम श्री योजना राज्यात राबविण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय धोरण ठरविले होते. त्यानुसार पीम श्री योजना राबविली जाणार आहे. त्यामध्ये शाळांचे धोरण ठरविणारे आणि आदर्श असणारे शिक्षक यामध्ये इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

आदर्श आणि धोरण ठरविणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण याबरोबरच अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास यामध्ये समावेश असणार आहे. पुढील काळाची गरज ओळखून यामध्ये कौशल्य विकसित कसे करता येईल यावर भर दिला जाणार आहे.

पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शाळांना सक्षम केलं जाणार आहे. प्रयोगात्मक अध्ययन हा त्यातील महत्वाचा भाग असणार आहे. खेळाच्या माध्यमातून अभ्यास, संशोधन करून त्याचा अभ्यास, चर्चात्मक अभ्यास करण्यावरही भर दिला जाणार आहे.

याशिवाय प्रत्येक स्तरावर चाचणी कारणे आणि त्यानुसार ज्ञानात भर वाढविण्यासाठी विद्यार्थ्याची क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून घेणे. या बाबींचा महत्वाचा भाग या योजनेत असणार आहे.

या शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्यावर भर राहणार आहे. प्रयोगशाळांबरोबर डिजिटल वर्ग, वाचनालय, खेळ विभाग आणि कला शिक्षण असणार आहे. याशियाय दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या बाबींचा समावेश केला जाणार आहे.

शेतीच्या निगडीत असलेल्या बाबीही शिकवल्या जाणार आहे. पाणी, वीज यांच्याबाबतचा सखोल अभ्यासावर भर असणार आहे. नैसर्गिक जीवनमान हा विषय सुद्धा या योजनेत घेण्यात आला आहे. त्यामुळे शाळेय वातावरणात मोठा बदल राहील.

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना स्वतःहून अध्ययन करण्याची इच्छा होईल त्यासाठी प्रोत्साहन देण्यावर या योजनेचा अधिक भर असेल. यामध्ये शाळांच्या बांधकामापासून ते दर्जेदार शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे.

विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.