AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी, बारावीचा निकाल अडचणीत, ६३ हजार शिक्षकांचे ‘बहिष्कार अस्त्र’

SSC and HSC Result : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेनंतर पालक आणि विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा असते. परंतु पालकांसाठी चिंता निर्माण करणारी बातमी आहे. पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.

दहावी, बारावीचा निकाल अडचणीत, ६३ हजार शिक्षकांचे 'बहिष्कार अस्त्र'
परिक्षाImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 06, 2024 | 1:23 PM
Share

भूषण पाटील, कोल्हापूर | दि. 6 मार्च 2024 : दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दोन्ही परीक्षा संपणार आहे. परंतु परीक्षा सुरु असतानाच पालकांसाठी चिंता निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बहिष्काराचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. आता विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या समिती ६३ हजार शिक्षक आहेत.

शिक्षकांचा का पेपर तपासणीवर बहिष्कार

शासन शाळांना देत असलेल्या अनुदानाचा टप्पा वाढवत नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या सचिवांना दिल्याचे संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. जोपर्यंत अनुदानाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुख्याध्यापकांनी पेपर देऊ नये

विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे पेपर तपासणीसाठी मुख्याध्यापकांनी स्विकारु नये. हे पेपर घेतले गेले असतील तर मुख्याध्यापकांनी शिक्षकांना पेपर देऊ नये. बोर्डाकडून दबाब आल्यास शिक्षकांनी संघटनेशी संपर्क साधावा. पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार असणार आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची भीती आहे.

यामुळे बहिष्कार घेतला होता मागे

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बारावीची परीक्षा सुरु होताच बहिष्कार सुरु केला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांच्या बैठक होत नव्हत्या. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांसोबत संघटनेशी चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संघटनेने बहिष्कार मागे घेतला होता. परंतु आता विनाअनुदानित शाळा कृती समिती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......