AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळीच निवडणुका, निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे लखनऊमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणूक होणार असून, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळीच निवडणुका, निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 2:53 PM
Share

लखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे लखनऊमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणूक होणार असून, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पुढे बोलताना चंद्रा यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांबाबत धाकधूक वाढली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय प्रमुख पक्ष कोरोनाच्या नियमाचे पालन करुन ठरलेल्या वेळेतच निवडणूक घेण्यासाठी आग्रही असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम हा ठरलेल्या वेळेतच होईल. पाच जानेवारीला मतदारांची अंतिम यादी जारी करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

वृद्ध, अपंगांसाठी विशेष व्यवस्था

यावेळी बोलतान सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे की, 80 वर्षांपुढील वृद्ध, अपंग व्यक्ती आणि कोरोनाबाधित असे जे नागरिक मतदानासाठी येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदानाची खास सोय करण्यात येईल. निवडणूक अधिकारी मत घेण्यासाठी त्यांच्याकडे जातील. सामान्यपणे उत्तर प्रदेशमधील मतदारांची एकूण संख्या ही 15 कोटींपेक्षा अधिक असून, मतदारांची अंतिम यादी आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत  52.8 लाख नव्या मतदारांनी नाव नोंदवले असून, त्यामध्ये 23.92 लाख पुरूष तर 28.86 महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील प्रमुख पक्षांसोबत बैठक

आम्ही राज्यातील प्रमुख पक्षाबरोबर बैठक घेतली असून, सर्वांनीच ठरलेल्या वेळेत निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच निवडणुकांच्या प्राचारसभेत दोन समाजात फूट पाडणारे किंवा ज्यामुळे दंगे होऊ शकतात असे भाषण टाळले पाहिजे, असेही काही पक्षांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी जास्ती -जास्त वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी चंद्रा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Kalicharan Maharaj Arrested | कालीचरण महाराज यांना अखेर अटक, छत्तीसगड पोलिसांची कारवाई

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.