AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत. आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात
योगी आदित्यनाथImage Credit source: social
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 1:42 PM
Share

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत. आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील 105 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

राजनाथ सिंह यांच्या चिरंजीवाला उमेदवारी

भाजपने पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह यांनाही तिकीट दिलं आहे. या शिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांनाही निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

तर 60 जागांवर प्रभाव पडला असता

योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून मैदानात उतरवले जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांना गोरखपूर शहरमधून मैदानात उतरवण्यात आलं आहे. अयोध्येतून योगींना तिकीट देऊन भाजपला संपूर्ण राज्यात मेसेज द्यायचा होता. योगी आदित्यनाथ अयोध्येतून उभे राहिले असते तर त्यांनी किमान 60 जागांवर प्रभाव पाडला असता असं सांगितलं जातं. मात्र, योगी हे गोरखपूरचे असल्याने त्यांनी होमपीचवरून निवडणूक लढवण्यावर प्राधान्य दिल्याचं सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्यही सिराथूमधून लढतील असं सांगितलं जात होतं. त्यांच्या एका निकटवर्तीय नेत्याला सिराथू मतदारसंघाचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार मोर्य यांना सिराथूमधून तिकीट देण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश दंगल मुक्त झालं

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी योगी आदित्यनाथ सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात उत्तर प्रदेश दंगामुक्त झाला. राज्यात रुग्णालये आणि शाळा सुरू झाल्या. राज्यात एक्सप्रेस वे सुरू झाले. उत्तर प्रदेशात सर्वात मोठं विमानतळ तयार होत आहे, असं प्रधान म्हणाले.

कोण कुठून लढणार?

शामली- तजेंद्र सिंह निर्वाल बुढ़ाना- उमेश मलिक चरथावल- सपना कश्यप पूरकाजी- प्रमोद ओटवाल मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल खतौली- विक्रम सैनी मीरापूर- प्रशांत गुर्जर सिवालखास- मनेंद्र पाल सिंह सरदना- संगीत सोम हस्तिनापूर- दिनेश खटीक मेरठ कँट- अमित अग्रवाल किठोर- सत्यवीर त्यागी मेरठ- कमलदत शर्मा मेरठ साउथ- सोमेंदर तोमर छपरउली- सहेंद्र सिंह रमाला बड़ोत- केपी सिंह मलिक बागपत- योगेश धामा लोनी- नंदकिशोर गुर्जर मुरादनगर-अजीत पाल त्यागी साहिबाबाद- सुनील शर्मा

सात टप्प्यात मतदान

उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.