AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान यांचा घटस्फोट; लग्नापूर्वी ठेवल्या होत्या या 3 अटी

दिग्गज संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्नी सायरा बानोला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलंय. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघं विभक्त होत आहेत. रेहमान आणि सायरा बानो यांनी अरेंज मॅरेज केलं होतं. या लग्नापूर्वी रेहमान यांनी तीन अटी ठेवल्या होत्या.

लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान यांचा घटस्फोट; लग्नापूर्वी ठेवल्या होत्या या 3 अटी
A R Rahman and Saira BanuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2024 | 8:46 AM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानो यांना घटस्फोट दिला आहे. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट लिहित त्यांना सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी अरेंज मॅरेज केलं होतं आणि आपल्या पत्नीसाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. अभिनेत्री सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी याविषयीचा खुलासा केला होता. जोडीदार निवडण्यात त्यांच्या आईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

रेहमान यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जोडीदार शोधण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा नव्हता. “प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर माझ्याकडे जोडीदार शोधण्यासाठी वेळ नव्हता. त्यावेळी मी माझ्या कामात खूप व्यस्त होतो. पण मला माहीत होतं की लग्नासाठी तीच योग्य वेळ होती. मी 27 वर्षांचा होतो आणि माझ्या आईला सांगितलं की तुम्हीच माझ्यासाठी जोडीदार शोधा. यासोबतच मी त्यांना माझ्या तीन अटी सांगितल्या होत्या. ती सुंदर असावी, सुशिक्षित असावी आणि त्याचसोबत स्वभावाने दयाळू असावी.. या माझ्या तीन अटी होत्या. सायरामध्ये माझ्या आईला हे तिन्ही गुण दिसले होते.”

रेहमान यांच्या आईने त्या दोघांची भेट चेन्नईतील एका सूफी मंदिरात करून दिली होती. याविषयी त्यांनी सांगितलं, “सायरा आणि माझं लग्न 12 मार्च 1995 रोजी चेन्नईतील त्याच इमारतीत झालं होतं जिथे मी 2006 मध्ये एएम स्टुडिओ सुरू केला होता.” ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांची मोठी मुलगी खतीजा रेहमानचं लग्न 2022 मध्ये पार पडलं होतं. या लग्नाचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रेहमान यांची पत्नी सायरा बानो या गुजरातमधील कच्छ इथल्या आहेत. तर त्यांचे वडील सौदी एअरलाइन्स आणि इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते. आश्चर्याची बाब म्हणजे रेहमान यांच्या आईने आधी सायराची छोटी बहीण मेहरसाठी स्थळ नेलं होतं. मात्र त्यांना सायराचा स्वभाव खूप आवडला आणि अखेर त्यांनी त्यांची निवड रेहमान यांच्यासाठी केली.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ