AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नापासून सलमान-शाहरुख राहिले दूर; कारण काय?

अभिनेता आमिर खानने नुकतंच गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. मात्र यात सलमान आणि शाहरुख खान कुठेच दिसले नाहीत. यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नापासून सलमान-शाहरुख राहिले दूर; कारण काय?
आमिर खान-गौरी स्प्रॅट, सलमान - शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2026 | 10:15 AM
Share

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने हे खऱ्या आयुष्यात सिद्ध केलं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र यामध्ये आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव कुठेच दिसले नाहीत. इतकंच नव्हे तर इंडस्ट्रीतील आमिरचे जिवलग मित्र सलमान खान आणि शाहरुख खानसुद्धा या लग्नाला उपस्थित नव्हते.

लग्नाआधी आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी त्याच्यासोबत आणि गौरीसोबत दिसल्या होत्या. इतकंच नव्हे तर या सर्वांना एकाच गाडीतून प्रवास करतानाही पाहिलं गेलं. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाला रिना आणि किरणसुद्धा उपस्थित असतील, असा अंदाज होता. आमिर आणि गौरीच्या लग्नाला त्यांची सर्व मुलं उपस्थित होती. जुनैद, आयरा आणि आझाद या लग्नात सहभागी झाले होते. याशिवाय इंडस्ट्रीतील परिचयाचे चेहरेसुद्धा या लग्नाचे साक्षीदार बनले होते. मात्र रिना दत्ता आणि किरण राव यांनी स्वत:ला आमिरच्या तिसऱ्या लग्नापासून दूर ठेवलं होतं.

पहा लग्नाचा फोटो-

View this post on Instagram

A post shared by gauri spratt (@gauri_spratt)

आमिरच्या लग्नात चाहत्यांना फक्त रिना आणि किरण यांचीच कमतरता जाणवली नाही, तर जिवलग मित्र सलमान खान आणि शाहरुख यांच्या अनुपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं. सलमान आणि शाहरुख हे आमिरच्या प्रत्येक सुखदु:खात त्याच्यासोबत होत. आमिरने सर्वांत आधी या दोघांशीच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. मात्र आमिर आणि गौरीच्या खास दिवशीच दोघंही गैरहजर राहिले. कदाचित हे दोघं त्यांच्या कामात किंवा शूटिंगमध्ये व्यस्त असतील, असंही म्हटलं जात आहे.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट हे दोघं एकमेकांना गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होते. 2024 मध्ये बंगळुरूमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली आणि या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं. हळूहळू आमिर आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर ते मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. गौरीचंही हे दुसरं लग्न असून पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. आमिर आणि गौरीने विशेष विवाह कायद्याअंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं.

Follow Us
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर