AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
Manoj KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 04, 2025 | 8:57 AM
Share

दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे. देशप्रेमावर आधारित या चित्रपटांमुळे ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ग्लॅमर विश्वात प्रवेश करताच त्यांची नावं बदलली. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार हेदेखील त्यापैकी एक आहेत. मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार असं बदललं. अनेक देशभक्तीपर चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबादमध्ये झाला, जो फाळणीनंतर पाकिस्तानचा हिस्सा बनला. मनोज कुमार यांच्या आईवडिलांनी तेव्हा भारताची निवड केली आणि दिल्लीला राहायला आले. मनोज कुमार यांनी फाळणीचं दु:ख स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडायचं. त्यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वत:चं नाव बदलून मनोज कुमार असं ठेवलं होतं.

मनोज कुमार हे कॉलेजमध्ये असतानाच थिएटरशी जोडले गेले होते. अखेर एकेदिवशी त्यांनी दिल्लीहून मुंबईला यायचं ठरवलं होतं. मनोज कुमार यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांचा ‘कांच की गुडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेते होते आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला होता. मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचं नाव ‘भारत कुमार’ असंच असायचं. याच कारणामुळे ते चाहत्यांमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले होते.

मनोज कुमार यांचं कलाकारांसोबत राजकीय नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं होतं आणि या युद्धानंतर मनोज कुमार यांनी लाल बहादूर शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शास्त्रींनी मनोज कुमार यांना युद्धामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल चित्रपट काढण्यास सांगितलं होतं. त्यावेळी मनोज कुमार यांना चित्रपट बनवण्याविषयीचा तेवढा अनुभव नव्हता. तरीही त्यांनी ‘जय जवान जय किसान’शी संबंधित ‘उपकार’ हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं