AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोक काहीही म्हणूदेत..’; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही.

'लोक काहीही म्हणूदेत..'; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तरImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 1:25 PM
Share

केरळ: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही. तर रवींद्रनेही महालक्ष्मीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

महालक्ष्मीचा फोटो शेअर करत रवींद्रने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून मी आनंदी नाही. तर तू पूर्णपणे माझ्यासाठी जगतेस, म्हणून मी आनंदी आहे. जरी मी हे व्यक्त करत नसलो तरी.. अम्मू या 100 दिवसांसाठी मी खूप चांगली पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला मनापासून जे वाटतं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘अम्मू.. 37 वर्षांनंतर.. मी या 100 दिवसांतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगलोय’ असंही त्याने पुढे लिहिलंय. दुसरीकडे महालक्ष्मीनेही वीरेंद्रसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘लोक काहीही म्हणूदेत, मी तुझ्यावर तोपर्यंत प्रेम करीन जोपर्यंत माझं हृदय धडधडणं बंद होणार नाही. तुझ्याशिवाय मी काहीच नाही’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर तिने रवींद्रशी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

महालक्ष्मीने ‘वाणी रानी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरसी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बयामेन’ आणि केलाडी कनमनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर रवींद्र चंद्रशेखरने ‘नालनम नंदिनीयम’, ‘सुट्टा कढ़ाई’, ‘नत्पुना एन्नानु थेरियुमा’ आणि ‘मुरुंगकाई चिप्स’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.