AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोक काहीही म्हणूदेत..’; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही.

'लोक काहीही म्हणूदेत..'; पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
पतीच्या दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तरImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 1:25 PM
Share

केरळ: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर महालक्ष्मीला अनेकदा पतीवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र सोशल मीडियावर रवींद्रसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करण्यात ती कधीच मागे हटत नाही. तर रवींद्रनेही महालक्ष्मीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

महालक्ष्मीचा फोटो शेअर करत रवींद्रने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून मी आनंदी नाही. तर तू पूर्णपणे माझ्यासाठी जगतेस, म्हणून मी आनंदी आहे. जरी मी हे व्यक्त करत नसलो तरी.. अम्मू या 100 दिवसांसाठी मी खूप चांगली पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला मनापासून जे वाटतं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘अम्मू.. 37 वर्षांनंतर.. मी या 100 दिवसांतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगलोय’ असंही त्याने पुढे लिहिलंय. दुसरीकडे महालक्ष्मीनेही वीरेंद्रसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘लोक काहीही म्हणूदेत, मी तुझ्यावर तोपर्यंत प्रेम करीन जोपर्यंत माझं हृदय धडधडणं बंद होणार नाही. तुझ्याशिवाय मी काहीच नाही’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर तिने रवींद्रशी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

महालक्ष्मीने ‘वाणी रानी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरसी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बयामेन’ आणि केलाडी कनमनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर रवींद्र चंद्रशेखरने ‘नालनम नंदिनीयम’, ‘सुट्टा कढ़ाई’, ‘नत्पुना एन्नानु थेरियुमा’ आणि ‘मुरुंगकाई चिप्स’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.