AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा

'सिंघम अगेन'च्या प्रमोशनदरम्यान अर्जुन कपूरने सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ही सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे.

ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था...; रोहित शेट्टीकडून खुलासा
Arjun Kapoor, Malaika Arora and Rohit ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2024 | 10:09 AM
Share

अभिनेता अर्जुन कपूरने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. व्यावसायिक पातळीवर अर्जुनला जरी यश मिळत असलं तरी वैयक्तिक पातळीवर त्याच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. अशातच ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर करत ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अर्जुनची काय अवस्था होती.

“आम्ही शूटिंग करत असताना अर्जुन कोणत्या गोष्टींचा सामना करत होता, हे मला नीट माहीत आहे. त्याच्या आयुष्यात एक टप्पा असाही होता जेव्हा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते आणि लोक त्याला ट्रोल करत होते. आजकाल सोशल मीडियावर हे सगळं कशा पद्धतीने होतं, ते मी समजू शकतो. ट्रोलिंगचा सामना करणं हे आमच्यापैकी कोणालाच सोपं नाही आणि त्यातून सावरत चांगलं काम करत राहणं अवघड होऊन जातं. पण मी खुश आहे की आता लोक अर्जुनच्या कामाचं कौतुक करत आहेत. सिंघम अगेनमध्ये इतक्या कलाकारांच्या भूमिका आहेत, पण लोक अर्जुनच्या भूमिकेचा उल्लेख आवर्जून करत आहेत”, असं रोहित म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनची मदत करण्याविषयी रोहित पुढे म्हणाला, “मी अजय सरांना गेल्या 33 वर्षांपासून ओळखतोय आणि त्याने मला लहान भावासारखं वागवलंय. तो नेहमीच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. बॉक्स ऑफिसचे नंबर्स महत्त्वाचे असतात पण विश्वास आणि श्रद्धाही महत्त्वाची असते. आम्ही अशा इंडस्ट्रीत काम करतो, जिथे रातोरात काहीच घडत नाही. प्रत्येकजण खूप मेहनत घेतो. इथे असा कोणताच दिग्दर्शक, निर्माता किंवा अभिनेता नाही ज्याला सर्वसामान्य काम करायचं आहे किंवा ज्याला कौतुक नाही केलं तरी चालतं. कधीकधी तुम्ही पास होता किंवा कधी नापास होता. पण विश्वास खूप महत्त्वाचा असतो.”

मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.