AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ ब्रेकअप झालं नसतं तर, आज विवाहित असती तब्बू, अभिनेता जगतोय आनंदी आयुष्य

Tabu Love Life | अभिनेत्री तब्बू हिच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची झाली होती एन्ट्री, पण 'या' सेलिब्रिटीसोबत ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने कधीच घेतला नाही लग्नाचा निर्णय, 'ते' ब्रेकअप झालं नसतं तर, आज तब्बू देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे असती विवाहित... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'ते' ब्रेकअप झालं नसतं तर, आज विवाहित असती तब्बू, अभिनेता जगतोय आनंदी आयुष्य
| Updated on: Apr 26, 2024 | 7:50 AM
Share

अभिनेत्री तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. नुकताच अभिनेत्री ‘क्रू’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात तब्बू हिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर आणि क्रिती सनॉन हिने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. पण आता तब्बू तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तब्बू हिने लग्न का केलं नाही? असा प्रश्न आजही चाहत्यांना असतो.

तब्बू हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत झाली. पण तब्बू एका सेलिब्रिटीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ते ब्रेकअप झालं नसतं, तर आज तब्बू हिचं देखील स्वतःचं एक कुटुंब असतं. अभिनेत्री विवाहित असती.

एक काळ असा होता, जेव्हा तब्बू हिच्या नावाची चर्चा दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आणि अभिनेते नागार्जुन यांच्यासोबत सुरु होती. अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत अभिनेत्रीचं फार घट्ट होतं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. नागार्जुन आणि तब्बू एक दोन नाहीतर, चक्क दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

नागार्जुन आणि तब्बू यांच्या रिलेशनशिपची चर्चा फक्त झगमगत्या विश्वातच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील रंगू लागली होती. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे नागार्जुन आणि तब्बू यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

तब्बू हिच्यासोबत लग्न करण्यासाठी नागार्जुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तब्बू हिने ठरवलं की, लग्न होणार नसेल तर, ब्रेकअप करुन विभक्त व्हायचं. अशात नागार्जुन आणि तब्बू यांचं दहा वर्षांचं नातं काही क्षणात तुटलं. ब्रेकअपनंतर तब्बू हिने अनेक गोष्टींचा सामना केला.

नागार्जुन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बू हिच्या आयुष्यात कधी कोणाची एन्ट्री झाली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने कधी लग्न करण्याचा देखील विचार केला नाही. म्हणून जर नागार्जुन आणि तब्बू यांचं ब्रेकअप झालं नसतं तर, अभिनेत्री आज विवाहित असती.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये तब्बू हिची असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...