AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय हिचे ‘ते’ फोटो व्हायरल, अभिषेक बच्चन याच्याशिवाय..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सध्या ऐश्वर्या ही तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. विविध चर्चा सुरू आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय हिचे 'ते' फोटो व्हायरल, अभिषेक बच्चन याच्याशिवाय..
Aishwarya Rai
| Updated on: Oct 24, 2024 | 7:44 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिषेक बच्चन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अभिषेक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन याच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर काही रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या चर्चा असताना देखील यावर कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडल्याचे देखील सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता नुकताच ऐश्वर्या राय हिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही भावाच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. यावेळी आराध्या देखील दिसत आहे.

नेहमीप्रमाणे या पार्टीला अभिषेक बच्चन हा अनुपस्थित आहे. सध्या अभिषेक बच्चन हा सध्या भोपाळमध्ये असल्याचे सांगितले जातंय. अभिषेक हा आजी इंदिरा भादुडी यांची काळजी घेतोय. अभिषेक बच्चन याच्या आजीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत खालावली असून आजीसोबत तो रूग्णालयातच आहे.

Aishwarya Rai

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुडी यांचे निधन झाल्याची चर्चा होती. मात्र, आता हे स्पष्ट करण्यात आले की, सध्या त्या रूग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत स्थिर आहे. भोपाळमध्ये असल्यानेच अभिषेक बच्चन या बर्थडे पार्टीला उपस्थित नसल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले.

अमिताभ बच्चन यांनी त्याचा प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्यानेच बच्चन कुटुंबात वाद झाल्याचे सांगितले जातंय. यामुळेच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती तिच्या आईच्या घरी मुलीसोबत शिफ्ट झालीये. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. हे बर्थडे पार्टीचे व्हायरल होणारे फोटो पाहून अनेकांनी अंदाज लावला की, घटस्फोटामुळेच अभिषेक हा बर्थडे पार्टीला पोहोचला नाही.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला